AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास धोक्याची..

भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. मॉन्सून केरळमध्ये असतानाच राज्यात पावसाने थैमान घातले. काल अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामध्येच आजही इशारा देण्यात आला.

राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, अवकाळी पावसाचे थैमान, पुढील 24 तास धोक्याची..
Yellow alert
| Updated on: Jun 05, 2026 | 7:11 AM
Share

मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. हळूहळू करून तो पुढे सरकेल. राज्यात मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. मॉन्सून राज्यात दाखल होण्यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला. हा मॉन्सूनचा पाऊस नसणार आहे, हा अवकाळी पाऊस आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम या भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. अकोला, वर्धा, ब्रह्यपुरी, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती, भंडारा, गोदिंया,जळगाव जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आज अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, गडचिरोली, गोदिंया, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे थैमान बघायला मिळेल. 15 जूनपर्यंत साधारणपणे राज्यात अवकाळी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर भागात मान्सून पूर्व पाऊस झाला आहे, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या पावसाने वातावरणातील उष्णता कमी झाली. गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी दररोज पाऊस कोसळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करणाऱ्या करमाळा शहरात पावसाने हजेरी लावली आहे. दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि आकाश ढगांनी ओसंडून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात मॉन्सून अजून दाखल झाला नसला तरीही अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस बघायला मिळत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पावसाचा येलो अलर्ट राज्यात जारी केला. देशातील अनेक राज्यातही अवकाळी पाऊस सुरू आहे. जवळपास 17 राज्यांमध्ये अवकाळी पावसासह मोठ्या वादळाचा इशारा दिला. केरळमध्ये यंदा 2 दिवस उशिराने मॉन्सून दाखल झाला.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी