AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार कोसळणार हे आम्ही का म्हणतोय? पुढच्या 5-6 दिवसात… जयंत पाटील यांनी नेमकं कारण सांगितलं…

राज्यात राजकीय स्थैर्य आहे, असं वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, ' अस्थिरता आहे. राज्याच्या सरकारवर टांगती तलवार आहे. सत्तारुढ लोकांच्या मनातच अस्थिरता आहे.

सरकार कोसळणार हे आम्ही का म्हणतोय? पुढच्या 5-6 दिवसात... जयंत पाटील यांनी नेमकं कारण सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 13, 2023 | 3:22 PM
Share

मुंबईः महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्यापासून सुप्रीम कोर्टात (Supreme court)अंतिम सुनावणीला सुरुवात होतेय. राज्यातील जनतेचं या महाखटल्याकडे लक्ष लागलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे सरकार काही दिवसात कोसळेल, अशी वक्तव्य राष्ट्रवादी (NCP) तसेच इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार केली जात आहेत. त्याचा नेमका आधार काय असा प्रश्न विचारला असता, जयंत पाटील यांनी हे उत्तर दिलंय. राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात पूर्ण होईल. कायद्यानुसार निकाल दिला गेला तर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील आणि हे सरकार बेकायदेशीर असल्याचं सिद्ध होईल, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. सरकार अस्थिर असून त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असल्याचं पाटील म्हणाले. टीव्ही ९ मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.

सत्तारुढ लोकांच्या मनातच अस्थिरता…

राज्यात राजकीय स्थैर्य आहे, असं वाटतं का, या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, ‘ अस्थिरता आहे. राज्याच्या सरकारवर टांगती तलवार आहे. सत्तारुढ लोकांच्या मनातच अस्थिरता आहे. पुढं कसं होणार, या चिंतेने चिंता आहे. कारण सरकारने जे कृत्य केलंय, हे बेकायदेशीर आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

म्हणून कोसळण्याची वक्तव्ये…

राष्ट्रवादी ,काँग्रेस तसेच शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार शिंदे सरकार कोसळण्याची वक्तव्य होतायत. ती कोणत्या आधारावर असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाने फार दिवस लावलेत. एखाद्या राज्यात बेकायदेशीर सत्ता ग्रहण केली असेल तर तातडीने त्या केस निकालात काढणं हे आवश्यक होतं. पण कोर्टाने तारखावर तारखा दिल्या. बेकायदेशीर सत्तेत असलेल्या सरकारला दीर्घकाळ काम करण्याची संधी दिली. त्यामुळे संशयाची जागा निर्माण व्हायला वाव आहे. आम्ही तारखा देतोय, त्या याच आधारावर…

‘काय होईल सांगता येत नाही…’

सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल, यावर अंदाज व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले, ‘ 16 जणांची सुनावणी सुरु झाली आहे. 5-6 दिवसात निकाल येणार. कायद्यानुसार निर्णय झाला तर सरकार अवैध ठरेल. पण अलिकडे न्यायाधीश रिटायर्ड झाल्यावर त्यांना राज्यपाल करण्यात येतं, त्यामुळे कधी काय होईल, काही सांगता येत नाही…

Follow Us
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल