AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

jayant patil ! अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं; जयंत पाटलांचा आरोप

पूर्वीच्या सरकारने अन्वय नाईकप्रकरण दाबलं होतं, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. (jayant patil slams bjp over anvay naik suicide case)

jayant patil ! अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं; जयंत पाटलांचा आरोप
| Updated on: Nov 08, 2020 | 6:58 PM
Share

सिंधुदुर्ग: अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. त्यात राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असं सांगतानाच पूर्वीच्या सरकारने हे प्रकरण दाबलं होतं, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. (jayant patil slams bjp over anvay naik suicide case)

कोकण दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी हा आरोप केला. अर्णव गोस्वामी यांना पत्रकारीतेप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णव यांचे नाव आहे. त्यांच्या एकट्याचंच नव्हे तर आणखी दोघांचं त्यात नाव असून त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचं पाटील म्हणाले.

नाईक कुटुंबांनी कोर्टाला विनंती केल्यानंतर कोर्टाच्या परवानगीने हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आहे. पूर्वीच्या सरकराने हे प्रकरण दाबलं होतं. पूर्वीच्या सरकारच्या काळात गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. खरे तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तिला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा जाब नोंदवला जातो. मात्र, पूर्वीच्या सरकारच्या काळात उलटाच प्रकार झाला, असं सांगतानाच आता पोलिसांना काही धागेदोरे सापडले असतील. त्यामुळे त्यांना अटक केली. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. कायदा सर्वांना समान आहे, असं पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची जी भूमिका तिच आमची

यावेळी पाटील यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अधिक भाष्य टाळलं. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे. तिच आमची भूमिका आहे. त्यात वेगळं सांगण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. मेट्रो कारशेडबाबत केंद्राने तशी भूमिका का घेतली हे माहीत नाही. तपशीलात जाऊन त्याची माहिती घ्यावी लागेल, असं सांगून त्यांनी या प्रश्नावर अधिक भाष्य टाळलं. (jayant patil slams bjp over anvay naik suicide case)

मराठा आरक्षणाकडे राजकारणातून पाहू नये

मराठा आरक्षण प्रश्नी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत त्यांना विचारलं असता मेटेंचं वक्तव्य मी पाहिलेलं नाही. मी हल्ली टीव्हीही पाहत नाही, असं ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. भाजपने याप्रकरणी दिलेले वकीलच खटला लढत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, मराठा समाजाच्या हिताचा प्रश्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

पोलिसांना गुंगारा देत अर्णव गोस्वामींपर्यंत पोहोचवण्यात आला मोबाईल फोन?

अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी; सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा निर्णय

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी…

(jayant patil slams bjp over anvay naik suicide case)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.