AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Monsoon session : राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Maharashtra Assembly Monsoon session : राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 08, 2022 | 2:06 PM
Share

मुंबई : 18 जुलैपासून सुरू होणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पुढे ढकलण्यात आले होते. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं म्हटलं होतं. महाराष्ट्रात (Maharashtra) नवं सरकार स्थापण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधक टीका करीत आहेत. तसेच अधिवेशन कधी होणार याबाबत ही विचारणा केली जात होती. परंतु पासाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात मंत्री मंडळ विस्तार देखील होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. ज्यामध्ये नवीन सभापतींची निवड आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली होती. यानंतर सभागृहाचे पावसाळी अधिवेशन होणार होते. परंतु जे काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने आत्तापर्यंत विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत कायम दिसत असल्याने त्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होती. आत्ता दोन दिवसात होणाऱ्या मंत्रीमंडळात नेमकं मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे देखील लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता देखील अधिक आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.