AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Monsoon session : राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Maharashtra Assembly Monsoon session : राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 08, 2022 | 2:06 PM
Share

मुंबई : 18 जुलैपासून सुरू होणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पुढे ढकलण्यात आले होते. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं म्हटलं होतं. महाराष्ट्रात (Maharashtra) नवं सरकार स्थापण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधक टीका करीत आहेत. तसेच अधिवेशन कधी होणार याबाबत ही विचारणा केली जात होती. परंतु पासाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात मंत्री मंडळ विस्तार देखील होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. ज्यामध्ये नवीन सभापतींची निवड आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली होती. यानंतर सभागृहाचे पावसाळी अधिवेशन होणार होते. परंतु जे काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने आत्तापर्यंत विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत कायम दिसत असल्याने त्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होती. आत्ता दोन दिवसात होणाऱ्या मंत्रीमंडळात नेमकं मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे देखील लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता देखील अधिक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.