AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Monsoon session : राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Maharashtra Assembly Monsoon session : राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 08, 2022 | 2:06 PM
Share

मुंबई : 18 जुलैपासून सुरू होणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पुढे ढकलण्यात आले होते. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं म्हटलं होतं. महाराष्ट्रात (Maharashtra) नवं सरकार स्थापण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधक टीका करीत आहेत. तसेच अधिवेशन कधी होणार याबाबत ही विचारणा केली जात होती. परंतु पासाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात मंत्री मंडळ विस्तार देखील होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. ज्यामध्ये नवीन सभापतींची निवड आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली होती. यानंतर सभागृहाचे पावसाळी अधिवेशन होणार होते. परंतु जे काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने आत्तापर्यंत विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत कायम दिसत असल्याने त्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होती. आत्ता दोन दिवसात होणाऱ्या मंत्रीमंडळात नेमकं मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे देखील लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता देखील अधिक आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.