AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढचे 48 तास महत्त्वाचे ! जोरदार लॉबिंग,, सेटिंग, फिल्डिंग सुरू… मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या

देवेंद्र फडणवीस सरकारचा विस्तार येत्या 48 तासांत होणार असून, यासाठी शिंदे गटात जोरदार लॉबिंग सुरू आहे. मंत्रिपदांची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांमध्ये स्पर्धा आहे. मंत्रिपद वाटपासाठी प्रदेशनिहाय प्रतिनिधित्व आणि पक्ष बळकटीकरण यावर चर्चा सुरू आहे. अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युलाही चर्चेत असून यामुळे इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

पुढचे 48 तास महत्त्वाचे ! जोरदार लॉबिंग,, सेटिंग, फिल्डिंग सुरू... मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 13, 2024 | 5:30 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसात होणार आहे. हिवाळी अधिवेशनातच रविवारी नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी म्हणून इच्छुकांची जोरदार लॉबिंग, सेटिंग, फिल्डिंग सुरू झाली आहे. खासकरून मंत्रिपदासाठी शिंदे गटात मोठी लॉबिंग सुरू आहे. पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. कुणाला मंत्रिपदं द्यायची आणि कुणाला नाही याची चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी फडणवीस सरकारचा विस्तार होणार आहे. या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. मंत्रिमंडळात 13 मंत्र्यांनाच स्थान मिळणार असल्याने कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कुणाला नाही यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात 14 महापालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यामुळे कोणत्या भागात किती मंत्रिपदं द्यायची, प्रदेशनिहाय मंत्रिपदं द्यायची का? पक्ष मजबूत करण्यासाठी कोणत्या भागावर जोर द्यावा लागेल याची चर्चाही या बैठकीत करून नंतरच मंत्रिपदाचं वाटप केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

इच्छुकांना कसं समजावणार?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले होते. पण त्यातील फार थोड्यांनाच संधी मिळाली होती. अजितदादा यांचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे कमी झाली होती. त्यामुळे शिंदे गटाच्या अनेकांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर सरकारच्या अखेरच्या काळात काही आमदारांना महामंडळ देऊन त्यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र, आता फडणवीस सरकार पाच वर्षासाठी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला फुल्ल टर्म मंत्रिपद हवं आहे, ज्यांना मागच्यावेळी मंत्रिपद मिळालं नव्हतं ते आता मंत्रिपदासाठी दावा ठोकून बसले आहेत. त्यामुळे या इच्छुकांची एकनाथ शिंदे कशी समजूत काढतात? किंवा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतात का? हे पाहावं लागणार आहे.

मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय?

फडणवीस सरकार पाच वर्ष राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला मंत्री बनायचं आहे. मात्र इच्छुक जास्त आणि मंत्रिपदं कमी अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे अडीच अडीच वर्ष प्रत्येकाला मंत्रिपद देण्याचं शिंदे गटात घटत आहे. हा फॉर्म्युला जर लागू केला तर पहिली अडीच वर्ष आपल्यालाच मिळावी म्हणून इच्छुकांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

असा ठरला फॉर्म्युला

फडणवीस सरकारमध्ये भाजपचे 21, शिंदे गटाचे 13 आणि अजितदादा गटाचे 9 मंत्री असणार आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार हा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नव्या सरकारमध्ये कुणाकडे कोणती खाती असणार याचंही वाटप करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...