AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं, पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा", अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi).

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं, पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : नवाब मलिक
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं : नवाब मलिक
| Updated on: May 02, 2021 | 4:56 PM
Share

गोंदिया : “देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शाह यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हात आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शाह आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi).

‘मोदी-शाह यांनी बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर उत्तर द्यावं’

“भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अबकी बार 200 आकडे पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण केलं. आता निवडणुकीच्या निकालाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे”, असं नवाब मलिक म्हणाले (Nawab Malik Slams Amit Shah and Narendra Modi).

नवाब मलिक यांचा गोंदिया दौरा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सकाळी 10 वाजता ग्रामीण कोविड रुग्णालय सडक अर्जुनीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान क्रीडा संकुल गोंदिया आणि केटीएस सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनंतर दीड वाजता खरीप हंगामाबाबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया दिली.

पश्चिम बंगालमध्ये नेमकं कोण विजयी ?

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 209 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बंगालमधील नंदीग्राम या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली होती. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. कारण या मतदारसंघातून भाजपकडून तेथील विद्यमान आमदार शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातील निवडणूक शेवटपर्यंत अटीतटीची राहिली. अखेर ममता बॅनर्जी 3727 मतांनी विजयी झाल्या. दुसरीकडे या निवडणुकीत बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांना प्रचंड कमी जागा मिळताना दिसत आहेत. बंगालमध्ये काँग्रेस दोन तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत.

हेही वाचा : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.