AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP: ज्यांना 100 आमदार निवडून आणता आले नाहीत…पवारांना भाजपा प्रदेशाध्यक्षांचे काय प्रत्युत्तर?

शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे, उद्धव ठाकरेंची नाही, असे वक्तव्यही बावनकुळे यांनी केले आहे. उध्दव ठाकरे यांचा आता फक्त गट राहिला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

BJP: ज्यांना 100 आमदार निवडून आणता आले नाहीत...पवारांना भाजपा प्रदेशाध्यक्षांचे काय प्रत्युत्तर?
पवारांना भाजपाचे प्रत्युत्तर Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 6:54 PM
Share

यवतमाळ– ज्यांचे संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेलं, ज्यांनी जेव्हा जेव्हा सत्ता मिळवली ती तोडफोडीतून मिळवली.  त्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) सर्टिफिकेटची पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi)गरज नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President)यांनी केली आहे. शरद पवार यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. अनेक राज्यांत ईडीचा गैरवापर किंवा तोडफेडीचे राजकारण करुन भाजपा सत्ता मिळवत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

शरद पवार यांच्या पूर्ण आयुष्याचा इतिहास बघितला तर त्यांचे संपूर्ण आयुष्य तोडफोडीत गेले आहे, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. स्वतःच्या भरवश्यावर त्यांना 100 आमदारही कधी निवडणून आणता आलेले नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले. शरद पवारांनी जेव्हा-जेव्हा सता मिळवली तेव्हा-तेव्हा ती तोडफोडीतून मिळवली. अशी टीकाही बावनकुळेंनी केली.

पंतप्रधान मोदींनी 8 वर्ष मध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आहे. याचे प्रमाणपत्र जनता देत आहे. शरद पवार यांच्या सर्टिफिकेटची मोदींना गरज नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, उध्दव ठाकरे यांचा गट – बावनकुळे

शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे, उद्धव ठाकरेंची नाही, असे वक्तव्यही बावनकुळे यांनी केले आहे. उध्दव ठाकरे यांचा आता फक्त गट राहिला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेना हिंदुत्ववादीही आहे आणि एकनाथ शिंदेंची आहे, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले म्हणून 40 आमदार आणि 12 खासदार सोडून गेले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दौऱ्याबाबत काय सल्ला?

गेले अडीच वर्षाचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांनी हिंदू विरोधी काम केले आहे, असे बावनकुळे म्हणाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्रात कुठे फिरण्यात अर्थ नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत दौरा करावा, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.