बेईमानी करून आलेल्या ‘त्या’ सरकारला एक वर्ष पूर्ण; नवाब मलिकांची भाजपवर खोचक टीका

भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बेईमानी करून आलेलं सरकार, अशी संभावना केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. (ncp leader nawab malik slams bjp)

बेईमानी करून आलेल्या 'त्या' सरकारला एक वर्ष पूर्ण; नवाब मलिकांची भाजपवर खोचक टीका
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 4:23 PM

मुंबई: भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बेईमानी करून आलेलं सरकार, अशी संभावना केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. भाजपने गेल्यावर्षी बेईमानी करून आणलेल्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (ncp leader nawab malik slams bjp)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना नवाब मलिक यांनी ही टीका केली. गेल्यावर्षी बेईमानीने तयार झालेले काही दिवसाचे सरकार राज्यात आले होते. त्याला एक वर्ष झालं आहे. भाजपने ही बेमाईनी केली होती, असं सांगतानाच आता काहीही केलं तरी सरकारला अडचण येणार नाही, असं मलिक यांनी सांगितलं.

वीजबिल माफीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने वीजबिल थकबाकी वसूल केली नाही. त्याचा परिणाम आज पाह्यला मिळत आहे. ग्राहकांना दिलासा द्यावा ही सरकारची इच्छा आहे. पण भाजपने एमएसईबीची अवस्था अत्यंत वाईट करून ठेवली आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

यावेळी कोरोनावरही त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या काळात जेवढी व्यवस्था राज्यात झाली. तेवढी व्यवस्था देशात कुठेच झाली नाही. महाराष्ट्र सरकारने कोरोना परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

हवेवर राजकारण चालत नाही

मलिक यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. कुणाचा झेंडा काय आहे. त्याचा रंग काय आहे. त्यावर राजकारण चालत नाही. मुंबईत भाजपची ताकद नाही. मागच्यावेळी त्यांची हवा होती. त्या हवेत त्यांचे नगरसेवक निवडून आले. कोणतंही राजकारण दीर्घकाळ ‘हवे’वर चालत नाही. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल, असं मला वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (ncp leader nawab malik slams bjp)

आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी

कोरोनाच्या आधी फेब्रुवारीत चुनाभट्टीमध्ये आमचं शिबीर झालं होतं. या शिबिराला आठ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही पालिका निवडणुकीच्या कामाला सुरुवातही केली होती. पण कोरोनामुळे ते थांबलं. पण आता आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. त्यासाठी संघटन बांधणी सुरू आहे. प्रत्येक वॉर्डात आमची बांधणी सुरू आहे, असं ते म्हणाले. सत्तेत असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे. पण आज त्यावर भाष्य करता येणार नाही. निवडणुकीला वेळ आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘वर्षपूर्ती जबाबदारीची, नांदी शाश्वत विकासाची’, महापौर मोहोळांचं एका वर्षाचं रिपोर्टकार्ड

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस

(ncp leader nawab malik slams bjp)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.