AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“स्वप्नातलं सत्यात फक्त पवार कुटुंबाने उतरवलं; चंद्रकांत दादा, अजून…” रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला

स्वप्नातलं सत्यात फक्त पवार कुटुंबाने उतरवलं; चंद्रकांत दादा, अजून... रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
रुपाली चाकणकर आणि चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Jan 16, 2021 | 3:25 PM
Share

पुणे : “स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. चंद्रकांत दादा, अजून काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना तुम्हाला पाहायची आहेत” अशा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टोला लगावला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) स्वप्नात आहेत का, या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चाकणकरांनी समाचार घेतला. (NCP Leader Rupali Chakankar takes a dig at Chandrakant Patil for taunting Supriya Sule)

“चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का, असे मत व्यक्त केले. एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवले आहे. नाहीतर कशाला 105 आमदार घेऊन घरी बसावं लागलं असतं. त्यामुळे एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी, अशक्य ते शक्य करुन दाखवले त्याला एक वर्ष झालं. अजून काही स्वप्नं आहेत ते साकार होताना चंद्रकांत दादा तुम्हाला पाहायची आहेत. आपली वैफल्यग्रस्त, नैराश्यजनक मानसिकता आम्ही समजू शकतो, आपणच सत्तेत येण्याची दिवा स्वप्नं पाहायची सोडून विरोधात आहोत हे सत्य स्वीकारावं” असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला.

Chandrakant Patil यांनी Supriya Sule ताई स्वप्नात आहेत का असे मत एका वृत्त वाहिनी सोबत बोलताना दिले. एक गोष्ट त्यांनी…

Posted by Rupali Chakankar on Saturday, 28 November 2020

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्या स्वप्नात आहेत का?” असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. “राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो किंवा इतर विषय, हे सरकार कशाबद्दलच खात्री देत नाही” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. (NCP Leader Rupali Chakankar takes a dig at Chandrakant Patil for taunting Supriya Sule)

हेही वाचा : ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’; सुप्रिया सुळेंची मोदींवर खोचक टीका

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांपेक्षा सुप्रिया सुळे यांना प्राधान्य देतील, असेही याआधी चंद्रकांतदादा म्हणाले होते.

संबंधित बातम्या

चंद्रकांतदादांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली? अजित पवारांची फटकेबाजी

तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का?; चंद्रकांतदादांचा टोला

(NCP Leader Rupali Chakankar takes a dig at Chandrakant Patil for taunting Supriya Sule)

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.