AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाई भाजपला फायद्याची की तोट्याची? ठाकरे गटाच्या खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी खासदारकी रद्दची कारवाई केली आहे. त्यावरून संपूर्ण देशात खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाई भाजपला फायद्याची की तोट्याची? ठाकरे गटाच्या खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 24, 2023 | 3:54 PM
Share

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बाब समोर आली आहे. कॉंग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सूरत कोर्टाने त्यांना दोषी ठरविल्यानंतर त्याचा आधार घेत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत असून यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून यामध्ये ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केले आहे. यामध्ये राहुल गांधी यांना फायदा होईल की नाही माहिती नाही मात्र भाजपला फायदा होणार की तोटा याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त करत खासदार अरविंद सावंत यांनी लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी राहुल गांधी यांच्यासोबत राहणार असल्याचे म्हंटले आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य नसल्याचे म्हंटले आहे.

राहूल गांधी यांच्यावरील कारवाई लोकशाहीच्या मुळावर गेली आहे. सूरत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर सर्वच बोलत आहे. यामध्ये दुसरी एक बाब म्हणजे सूरत कोर्टाने त्यांना वरच्या कोर्टात जाण्याची मुभा दिली आहे. तिथं जर वेगळा निर्णय आला तर मग काय करणार असेही अरविंद सावंत यांनी म्हंटलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला अरविंद सावंत यांनी इतक्या उतावीळ पणा कशासाठी करत आहात. हाच उतळविणा पणा आमच्या बाबतीत का नाही ? सहा ते सात महीने उलटून गेले अद्याप काहीही नाही. प्रकरण कोर्टात आहे.

सगळ्या संस्था हाताशी धरून काय केलं जात आहे. हे सर्वांना कळत आहे. सूरत ला न्यायाधीश बदलले गेले आहे त्यामुळे तुम्ही पुढची बाब ओळखून घ्या म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर खासदार अरविंद सावंत यांनी जहरी टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्यावर कारवाईच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. पण दुसऱ्या बाजूला लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी आम्ही राहुल गांधी आणि कॉंग्रेस सोबत राहू असा विश्वासही अरविंद सावंत यांनी व्यक्त केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. आणि हुकूमशाहीच्या अंताला सुरुवात झाली आहे. असं म्हणत आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.