अशोक चव्हाणांचा पक्ष संपवून काँग्रेसकडून आदर्श प्रकरणाचा बदला : नितेश राणे

कोल्हापूर : पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरुन काँग्रेस काही आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. याच संदर्भात बोलताना काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी कोल्हापुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. चव्हाण यांना आदर्श प्रकरणावरुन काढलं होतं. त्यामुळे ते महाराष्ट्रात काँग्रेस संपवून बदला घेत असतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर चांगलं काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची […]

अशोक चव्हाणांचा पक्ष संपवून काँग्रेसकडून आदर्श प्रकरणाचा बदला : नितेश राणे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

कोल्हापूर : पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरुन काँग्रेस काही आमदारांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. याच संदर्भात बोलताना काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी कोल्हापुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. चव्हाण यांना आदर्श प्रकरणावरुन काढलं होतं. त्यामुळे ते महाराष्ट्रात काँग्रेस संपवून बदला घेत असतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर चांगलं काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची वेळ काँग्रेसवर आली असेल तर त्यांनी आत्मचिंतन करावं, असं देखील नितेश राणे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाच आमदारांचा समावेश आहे. आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील

मुलाला अहमदनगरमधून उमेदवारी न दिल्याने विखे पाटील नाराज होते. ही जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे, पण राष्ट्रवादीने सुजय विखे यांच्यासाठी जागा सोडली नाही. त्यानंतर विखे पाटील पक्षापासून दुरावले आणि ते शिर्डी मतदारसंघात शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसले होते.

नितेश राणे

सध्या काँग्रेसचेच आमदार असलेले नितेश राणे यांनी त्यांचे बंधू निलेश राणे यांच्यासाठी काम केलं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसचाही उमेदवार होता. पण नितेश राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्यासाठी काम केलं.

आमदार अब्दुल सत्तार

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. औरंगाबादमध्ये काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे सत्तार नाराज होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधातच प्रचार केला. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची आपण पक्षातून हकालपट्टी करत असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केलं होतं.

आमदार जयकुमार गोरे

काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत करणार असल्याचा निर्धार केला होता. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत.  “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल,” असं ते म्हणाले होते.

आमदार कालिदास कोळंबकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या पक्षात जाईन, अशी घोषणा काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली होती. तसेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार असल्याचंही आमदार कालिदास कोळंबकर यांनी म्हटलं होतं. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. सलग सातवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे. नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राणेंसोबत आलेले सर्व आमदार शिवसेनेत परतले, मात्र केवळ कालिदास कोळंबकर हे काँग्रेसमध्येच राहिले. आता कालिदास कोळंबकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.