AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पक्ष पळवून दिवसाढवळ्या दरोडा…;” जयंत पाटील यांचा निशाणा

निकालातही दिसतं की, आम्ही आमचं काम पूर्ण केलं नाही. पण, आम्हाला कुणीतरी सांगत की, लवकर निर्णय करा.

पक्ष पळवून दिवसाढवळ्या दरोडा...; जयंत पाटील यांचा निशाणा
जयंत पाटील
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 19, 2023 | 1:03 PM
Share

सांगली : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वचं पक्ष या निर्णयाचा विरोध करत आहेत. ठाकरे गट आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, न्याय देणारे डोळ्यावर पट्टी बांधून कानाने ऐकून न्याय देत आहेत, असं लोकं म्हणायला लागले आहे. एक पक्ष पळवण्याचं काम करण्यात आलं. हे काम म्हणजे दिवसाढवळ्या या घरावर दरोडा घातला. आपण सगळे बघत बसलो आहोत. दरोडा घालण्याचं काम सुरू आहे. असं हे पक्ष पळवून नेण्याचं काम गेले सहा महिने सुरू होतं.

आठ लाख कागदपत्र उद्धव ठाकरे यांनी सादर केलीत. पण, निकाल देताना असं सांगितलं की, शिंदे यांच्याकडे एवढे आमदार आहेत. आमदारांना एवढी मतं आहेत. ती ७६ टक्के आहेत. ठाकरे गटाकडे उरलेल्या आमदारांची संख्या एवढी आहे. ती २४ टक्के आहेत. लोकं कुणाच्या मागे जास्त आहेत. त्यावरून हा निकाल दिला गेला.

असं होण्याची शक्यता आहे

अॅफिडेव्हीट तपासण्याचं काम अजून पूर्ण झालं नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना देण्यात आला. असा निर्णय देण्यात आला आहे. निकालातही दिसतं की, आम्ही आमचं काम पूर्ण केलं नाही. पण, आम्हाला कुणीतरी सांगत की, लवकर निर्णय करा. हा निर्णय झाल्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, त्यांच्या हातात पक्ष गेला. पक्षचं त्यांच्या बाजूने गेला. मग, बाकीच्या केसेस कुठं राहिल्या, असं होण्याची शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

जनतेच्या न्यायालयात निवाडा होणार

न्याय आहे किंवा नाही, याचा फैसला सगळ्यात मोठ्या न्यायालयात म्हणजे जनतेच्या न्यायालयात होईल. इंदिरा गांधी यांना घालवणारी जनता याच देशातील. दोन वर्षांनंतर चुकीचं झाल्याचं लक्षात येताच त्याचं इंदिरा गांधी यांना परत आणणारी जनतादेखील याचं देशाची असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर याचा निवाडा शंभर टक्के होईल, याचा मला विश्वास असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार