AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान

लोकसभा निवडणुकीनंतर आता नागपूर विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायलयातील नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. विदर्भातील निवडणुकीत दोषपूर्ण इव्हीएम वापरल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
| Updated on: Jul 09, 2019 | 8:56 AM
Share

नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता नागपूर विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायलयातील नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. विदर्भातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरल्याचा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार नितीन गडकरी, अशोक नेते, रामदास तडस, सुनील मेंढे, शिवसेना खासदार कृपाल तुमाने, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर या खासदारांविरोधात याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण मतदान आणि मतमोजणीत फरक झाल्याचे दिसून येत आहे. या फरकाचा फायदा मोठ्या प्रमाणात विजयी उमेदवारांना मिळाला असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागपूर विदर्भातील सहा खासदारांच्या निवडीला चक्क मुंबई उच्च न्यायलयात आव्हान देण्यात आलं आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार नितीन गडकरी यांना पुन्हा संधी देण्यात आली होती, तर काँग्रेसकडून नाना पटोले यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं. दरम्यान या मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विजयी ठरले होते. दरम्यान गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी याचिका दाखल केली आहे.

तर रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात लढत होत आहे. यात शिवसेनेचे कृपाल तुमाणे यांचा विजय झाला होता. तर तुमाणे यांच्याविरोधात काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी याचिका दाखल केली आहे.

त्याशिवाय चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, काँग्रेसच्या बाळू धानोरकर, वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे यांच्यात लढत झाली होती. यात काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांचा विजय झाला होता. त्यामुळे धानोरकर यांच्याविरोधात वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी याचिका दाखल केली आहे.

त्याशिवाय गडचिरोली चिमूरमधून भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना रिंगणात उतरवलं होतं. यात भाजपच्या अशोक नेते यांचा विजय झाला होता. तर भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनील मेढें तर आघाडीकडून नाना पंचबुद्धे रिंगणात उतरले होते. यात भाजपच्या सुनील मेंढे यांचा विजय झाला होता.

वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस रिंगणात उतरले होते. यात विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पुन्हा एकदा विजय झाला होता. दरम्यान या मतदारसंघातून विजयी झालेल्या सर्व खासदारांवर याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायलय या याचिकांवर काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.