AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीच्या अपयशाला नरेंद्र मोदी आणि शाह जबाबदार; मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात महायुतीचा मोठा पराभव झाला आहे. तर तुलनेने महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा महायुतीचा दावा फेल गेला आहे. त्यामुळे आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

महायुतीच्या अपयशाला नरेंद्र मोदी आणि शाह जबाबदार; मनसे नेत्याच्या विधानाने खळबळ
pm modi Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 13, 2024 | 3:39 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड अपयश मिळालं आहे. त्यानंतर आता टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबतचं मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. महाजन यांनी थेट भूमिका जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसेच्या या भूमिकेवर महायुतीचे नेते काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. लोकसभेत आमचा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी होता. बाकी महायुतीतल्या इतर पक्षाशी आमचा सबंध नाही. लोकसभे निवडणुकीत महायुतीला जे अपयश मिळालं आहे, त्याला फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी, अमित शाह जबाबदार आहेत. मोदी आणि शाह यांनी काही टोकाच्या भूमिका घेतल्या. त्या जनतेला पटल्या नाहीत, असं सांगतानाच अजित पवार यांना सोबत घेण्याचा फटका महायुतीला बसला आणि या पुढेही बसेल, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

मनसे स्वबळावर लढणार

मनसे स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार? असा सवाल प्रकाश महाजन यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मनसे महायुतीत लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला 200 ते 250 जागा लढवण्याच्या तयारीला लागण्यास सांगितलेलं आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहोत, असं महाजन म्हणाले.

पवारांचा उतरता काळ सुरू होईल

आरएसएसचे मुखपत्रात जे लिहीलय ते अगदी खरं आहे. शरद पवार यांना 8 खासदार मिळाले आहे हा उच्चांक झाला. आता त्यांचा उतरता काळ सुरू होईल, असा दावाही त्यांनी केला.

कधी तरी तावडेंना विचारा

फोडफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका बसला, देवेंद्र फडणवीस कसे वागले हे कधीतरी विनोद तावडेंना जाऊन विचारा. इथेच सगळं फेडाव लागणार आहे. राज्यात कधी नव्हे ते फतवे निघाले आहेत. मतदान झालं आहे. आम्ही जातपात मानत नाही. आमचा एकच धर्म तो म्हणजे हिंदू धर्म. आम्ही जातपात विचारत पण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.