AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, महाराष्ट्रात राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचं BMC आयुक्तांना पत्र

येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, महाराष्ट्रात राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचं BMC आयुक्तांना पत्र
Image Credit source: social media
| Updated on: Jan 12, 2023 | 8:39 AM
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील आठवड्यात महाराष्ट्रात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय (Maharashtra politics) वातावरण चांगलंच तापलं आहे. मुद्दा आहे, मुंबईतल्या विकास कामांच्या श्रेयवादाचा. युवासेना नेता आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना यासंदर्भात एक खरमरीत पत्र लिहिलंय. त्यात मुंबईतल्या विकासकामांसंदर्भात अनेक प्रश्न आयुक्तांना विचारण्यात आलेत.

आदित्य ठाकरे यांनी बीएमसी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सीवेज ट्रीटमेंट प्लांट आणि खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या प्रकल्पाला गती मिळाली होती. इस्रायलचे तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प मुंबईत उभारला जातोय.

सीवेज ट्रीटमेंट प्लांटसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या असतानाही याचे भूमीपूजन आतापर्यंत का झाले नाही? कुणाच्या प्रतीक्षेत एवढा सहा महिन्यांचा काळ वाया घालवला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.

पंतप्रधानांसाठी भूमीपूजन रखडवलं?

खाऱ्या पाण्याचे रुपांतर गोड्या पाण्याच्या रुपात करण्याच्या प्रकल्पावरूनही आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उभा केला. आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून तक्रार करण्यात आली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीक्षेसाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनाला विलंब केला गेला.

पंतप्रधानांच्या दौऱ्यात काय काय?

येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात मेट्रो २-ए आणि मेट्रो ७ चे उद्घाटनदेखील करतील. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागील वर्षी झाले आहे. दोन्ही मार्गावर २० किलोमीटरपर्यंत मेट्रोची ये-जा सुरु आहे. आता दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाईल. मोदी यांच्या हातून आणखी एक मोठं उद्घाटन होणार आहे. मुंबईतल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण. यासह बाळासाहेब ठाकरे आपका दवाखाना योजनेअंतर्गत ५२ दवाखान्यांचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते केलं जाईल.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.