AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळवा दुर्घटनेनंतर प्रवीण दरेकर आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी, जखमींची विचारपूस

कळवामधील घोलाईनगर परिसरात घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 जण जखमी होते. या जखमींची भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली.

कळवा दुर्घटनेनंतर प्रवीण दरेकर आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी, जखमींची विचारपूस
कळवा दुर्घटनेतील जखमींना प्रवीण दरेकरांची भेट
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 20, 2021 | 7:27 PM
Share

ठाणे : मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी कळवामधील घोलाईनगर परिसरात घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2 जण जखमी होते. या जखमींची भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकर यांच्या सोबत भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे उपस्थित होते. त्यानंतर दरेकर हे कळवा येथील दरड दुर्घनेत मृत्य कुटुंबियाचे नातेवाईक आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. (Praveen Darekar’s visit to the victims of the kalva accident)

प्रवीण दरेकर म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अगदी निरागस बालिका जखमी झाली आहे. तिच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची पुसट कल्पना देखील तिला कल्पना नाही. ही मन हेलवणारी घटना आहे. मुंबईत विक्रोळी, चेंबूर, भांडुपला आशा घटना घडल्या. त्याला भूमाफिया जबाबदार असल्याचा आरोप दरेकर यांनी केलाय. ज्या ठिकाणी आशा घटना घडल्या आहेत, तिथल्या संबंधित अधिकारी कोण होते? त्यांनी परवानगी होती का? याची माहिती घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. या दुर्घटनांचा आपण आणि देवेंद्र फडणवीस निश्चित पाठपुरावा करु असं आश्वासनही दरेकर यांनी यावेळी केलंय. अशा प्रकारच्या प्रवृत्ती ठेचल्या नाहीत तर अशा घटना घडतच राहतील. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दरेकर यांनी केलीय.

‘सरकार संवेदनाहीन, प्रशासनावर धाक उरला नाही’

प्रशासनावर धाक उरला नाही. अतिक्रमणाविरोधात कारवाई होत नाही. याला जबाबदार कोण? असा सवाल दरेकर यांनी केलाय. हे सरकार संवेदनाहीन आहे. ते तातडीनं काम करत नाही. निकृष्ट दर्जाचे काम, त्यामुळे पडणारे बळी हा सरकारचा निष्काळजीपणा आहे. अशा दुर्घटनानंतरही आमच्या संवेदना जागा होत नसतील तर काय? गेंड्याच्या कातडीचे राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावलाय.

नेमकं काय घडलं?

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सोमवारी पाऊस वैरी होऊन कोसळला. या मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेकांचा बळी घेतला आहे. चेंबूरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती ठाण्याच्या कळवा शहरात झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. एका घरावर दरड कोसळल्याने ते घर नेस्ताबूत झालं. ज्या नागरिकांनी ही घटना पाहिली त्यांच्यासाठी हा थरार शब्दांमध्ये सांगण अशक्य आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून सुखरुप काढलं आहे. पण आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या :

डोक्यावर मुसळधार पाऊस, शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं, ठाण्याचे पालिका आयुक्त भर पावसात रस्त्यावर

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, पोलिसांकडून तीन पथके स्थापन

Praveen Darekar’s visit to the victims of the kalva accident

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....