AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद; रवी राणा यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असले तरी आरोपप्रत्यारोपांच्या फैरी अजूनही थांबलेल्या नाहीत. अमरावतीतील नवनीत राणा यांचा पराभव आमदार रवी राणा यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे रवी राणा यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.

नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद; रवी राणा यांचा गंभीर आरोप
ravi ranaImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2024 | 2:41 PM
Share

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा अमरावतीत पराभव झाला. नवनीत राणा यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. त्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महायुतीतीलच घटक पक्षाने म्हणजे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने हा पराभव घडवून आणला. त्यामुळे महायुतीसाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवानंतर आता आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवनीत राणांना पाडण्यासाठी आणि अमरावतीत उमेदवार देण्यासाठी बच्चू कडू यांना मातोश्रीतून रसद पुरवल्या जात होती, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमदार रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बच्चू कडू हे तोडीबाज आणि मांडवलीबाज नेते आहेत. ते खोक्याचं राजकारण करत आले आहेत. ते कुणाचीही सुपारी घेऊ शकतात. त्यांना मातोश्रीवरून रसद आली, अनेक ठिकाणाहून रसद आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. माझ्याकडे निरोप आला. चर्चा झाली. ते सर्व मी अचलपूरच्या जनतेला योग्यवेळी सांगणार आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

मला थांबवण्याचा दम नाही

दोन महिन्यात सर्वांचा जनता हिशोब करणार आहे. आता रवी राणांचा नंबर आहे, असा दम बच्चू कडू यांनी मला दिला आहे. मला इथपर्यंत जनतेने पोहोचवलं आहे. जनता मला जेव्हा थांबा म्हणेल, तेव्हाच मी थांबेल. मला थांबवण्याचा कोणत्याही नेत्यात दम नाही, असा इशाराच राणा यांनी दिला.

ते दगाबाज

त्यांच्या मतदारसंघात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. बार्गेनिंग करून गप्प बसायचं आणि सरेंडर व्हायचं हे त्यांचं राजकारण आहे. हा दगाबाज असल्याचं महायुतीच्या नेत्यांनाही माहीत आहे. ते ज्या ताटात खातात तिथेच छिद्र करतात, असंही ते म्हणाले.

आम्ही पराभूत होऊन जिंकलो

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी त्यांच्या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहे. कारण आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. मी माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं. पण मला जनतेने का थांबवलं ते कळलं नाही. राज्यात काम करायचे की कुठे हे ठरवले नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.

काही लोक केवळ…

काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोकं दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात, असा टोला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला. अमरावतीत नेमकं काय घडलं हे आमच्या नेत्यांना माहीत आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही काही सांगायची गरज नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली