AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद; रवी राणा यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असले तरी आरोपप्रत्यारोपांच्या फैरी अजूनही थांबलेल्या नाहीत. अमरावतीतील नवनीत राणा यांचा पराभव आमदार रवी राणा यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे रवी राणा यांनी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.

नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीतून रसद; रवी राणा यांचा गंभीर आरोप
ravi ranaImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2024 | 2:41 PM
Share

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा अमरावतीत पराभव झाला. नवनीत राणा यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. त्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महायुतीतीलच घटक पक्षाने म्हणजे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने हा पराभव घडवून आणला. त्यामुळे महायुतीसाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. या पराभवानंतर आता आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नवनीत राणांना पाडण्यासाठी आणि अमरावतीत उमेदवार देण्यासाठी बच्चू कडू यांना मातोश्रीतून रसद पुरवल्या जात होती, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमदार रवी राणा यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बच्चू कडू हे तोडीबाज आणि मांडवलीबाज नेते आहेत. ते खोक्याचं राजकारण करत आले आहेत. ते कुणाचीही सुपारी घेऊ शकतात. त्यांना मातोश्रीवरून रसद आली, अनेक ठिकाणाहून रसद आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. माझ्याकडे निरोप आला. चर्चा झाली. ते सर्व मी अचलपूरच्या जनतेला योग्यवेळी सांगणार आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

मला थांबवण्याचा दम नाही

दोन महिन्यात सर्वांचा जनता हिशोब करणार आहे. आता रवी राणांचा नंबर आहे, असा दम बच्चू कडू यांनी मला दिला आहे. मला इथपर्यंत जनतेने पोहोचवलं आहे. जनता मला जेव्हा थांबा म्हणेल, तेव्हाच मी थांबेल. मला थांबवण्याचा कोणत्याही नेत्यात दम नाही, असा इशाराच राणा यांनी दिला.

ते दगाबाज

त्यांच्या मतदारसंघात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. बार्गेनिंग करून गप्प बसायचं आणि सरेंडर व्हायचं हे त्यांचं राजकारण आहे. हा दगाबाज असल्याचं महायुतीच्या नेत्यांनाही माहीत आहे. ते ज्या ताटात खातात तिथेच छिद्र करतात, असंही ते म्हणाले.

आम्ही पराभूत होऊन जिंकलो

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी त्यांच्या पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहे. कारण आमचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. मी माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं. पण मला जनतेने का थांबवलं ते कळलं नाही. राज्यात काम करायचे की कुठे हे ठरवले नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या.

काही लोक केवळ…

काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही लोकं दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी येतात, असा टोला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला. अमरावतीत नेमकं काय घडलं हे आमच्या नेत्यांना माहीत आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही काही सांगायची गरज नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.