AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृह आणि परिवहन विभागानंतर आता कृषी विभागातील ‘वाझे’कडूनही कोट्यवधींची वसुली, निलंगेकरांचा गंभीर आरोप

राज्यातील शेतकऱ्यांना लुटण्याचं, त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरु असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला आहे. खासगी कंपन्यांना हाताशी धरत खते, बी-बियाण्यांची टंचाई निर्माण केली जात असल्याचंही निलंगेकर यांनी म्हटलंय.

गृह आणि परिवहन विभागानंतर आता कृषी विभागातील 'वाझे'कडूनही कोट्यवधींची वसुली, निलंगेकरांचा गंभीर आरोप
भाजप आमदार संभाजी-पाटील निलंगेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 2:50 PM
Share

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकार चांगलंच अडचणीत आलं असताना आता कृषी विभागातील ‘वाझे’कडून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरु असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलाय. राज्यातील शेतकऱ्यांना लुटण्याचं, त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरु असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला आहे. खासगी कंपन्यांना हाताशी धरत खते, बी-बियाण्यांची टंचाई निर्माण केली जात असल्याचंही निलंगेकर यांनी म्हटलंय. संभाजी पाटील-निलंगेकरांच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Sambhaji Patil-Nilangekar’s serious allegation on Mahavikas Aghadi Government)

महाविकास आघाडी सरकार खासगी कंपन्यांचे दलाल म्हणून काम करत आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा या बांधावर गेल्यावर कळत असतात. मात्र, हे सरकार फक्त मुंबई आणि बांद्रापुरतं मर्यादित आहे. या सरकारला शेतकऱ्यांची काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही निलंगेकर यांनी केलीय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची फक्त घोषणा झाली. पण मागील दोन वर्षात एक रुपयाही मिळाला नाही. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 200 कोटी रुपये खासगी कंपनीच्या घशात घातले. लातूर जिल्ह्यातील स्थितीही साखरीच असल्याचं निलंगेकर म्हणाले.

‘सरकार पळपुटं, अधिवेशनात उत्तरं देऊ शकत नाही’

11 लाख क्विंटलपैकी फक्त 2 लाख क्विंटल बियाणी महाबीज देत आहे. खासगी आणि सरकारी भावात 1 हजार 500 ते 2000 रुपयांचा फरक आहे. मुंबईतून 100 कोटी रुपये काढणारे आता एका एका जिल्ह्यात 200 – 200 कोटी रुपये काढत असल्याचा घणाघात पाटील यांनी केलाय. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कंपन्या खताऐवजी माती देतील. फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक दिवस अधिवेशन घेण्याची गरज असताना हे सरकार संपूर्ण अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळत आहे. हे सरकार पळपुटं आहे. अधिवेशनात उत्तर देऊ शकत नाही, अशी टीकाही निलंगेकरांनी केलीय.

मराठा समाजानं हक्काचं मागितले तर काँग्रेसला राग का येतो?

यापूर्वी संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. “मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरले नाही, तर वेळ निघून जाईल असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सावध केले. हे काँग्रेस पक्षाला सहन झालं नाही. मराठा समाजाचे आरक्षण घालवल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या हक्काचं मागितलं तरीही काँग्रेसला राग का येतो,” असा सवाल संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांना विचारला होता.

संबंधित बातम्या :

हे तर कोरोनाच्या महालात झोपलेले भुताटकीचे सरकार; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मोफत होणार, सरकार लवकरच निर्णय घेणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

Sambhaji Patil-Nilangekar’s serious allegation on Mahavikas Aghadi Government

Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.