AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपशासित राज्यांत राज्यपालांकडून अस्थिरता निर्माण का केली जात नाही? संजय राऊतांचा सवाल

ज्यांना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असं वाटतं, त्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरु नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

भाजपशासित राज्यांत राज्यपालांकडून अस्थिरता निर्माण का केली जात नाही? संजय राऊतांचा सवाल
| Updated on: Oct 15, 2020 | 1:24 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यपालाच्या भूमिकेत राहून काम करावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. “भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. (Sanjay Raut advices Governor of Maharashtra to remain in limits)

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावं. भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यातच असा प्रयोग का केला जात आहे? आपल्या सरकारचा मुख्यमंत्री नसला की संघर्ष करायचा. राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानात राहून काम करावं” असं संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचित करताना ठणकावून सांगितलं.

“पश्चिम बंगालचे राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्या भूमिकेत काम करत आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे? भाजपशासित राज्यात मंदिरं का उघडली नाहीत?” असा सवालही त्यांनी विचारला.

“मूर्खांच्या नंदनवनात फिरु नका”

राजकीय भूमिकेत राहून राज्यपालांनी काम करु नये. पंतप्रधान, राज्यपाल ही सर्व धर्मनिरपेक्ष पदं आहेत. आपली घटनाही धर्मनिरपेक्ष आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याने सर्वांना अडचण होत आहे. कट कारस्थान करुन सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल, तर मूर्खपणाचं आहे. ज्यांना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असं वाटतं, त्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरु नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रावर निसर्गाचं संकट आहे. पूरस्थितीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. बिहारमध्ये शिवसेना 40 जागा लढवणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली. (Sanjay Raut advices Governor of Maharashtra to remain in limits)

संबंधित बातम्या :

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन डिवचणारं हेच ते राज्यपालांचं पत्र

(Sanjay Raut advices Governor of Maharashtra to remain in limits)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.