AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exclusive | उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मनातील बोलतील : संजय राऊत

ठोशास ठोसा असे उत्तर मिळावे अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे," असेही संजय राऊत म्हणाले.  (Sanjay Raut Exclusive Interview Before Shivsena Dasara melava)

Exclusive | उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मनातील बोलतील : संजय राऊत
| Updated on: Oct 25, 2020 | 4:42 PM
Share

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय बोलावे हे सांगणं माझा अधिकार नाही. ते मुख्यमंत्री आहेत. त्यांना या पदाचा शिष्टाचार पाळावा लागतो. ते नेहमी पाळतात. मात्र आज उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मनातील बोलतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी दिली. (Sanjay Raut Exclusive Interview Before Shivsena Dasara melava)

“आज आम्ही गुद्द्यांचा विचार करतो. मुद्दयांवरच राजकारण सुरु असतं. मात्र गेलं वर्षभरात ज्या पद्धतीने विरोधकांनी सरकारला, शिवसेनेला महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. नेत्यांना बदनाम केले. आमच्यावर चिखलफेक करतात. याला जशाच तसे उत्तर, ठोशास ठोसा असे उत्तर मिळावे अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे हे अधूनमधून मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढत असतात. नियमाच्या चौकटीत राहून ते मास्क वर-खाली करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. ते पूर्णपणे राजकीय उत्तर होतं. तुम्ही राजकारण म्हणून आमच्या अंगावर याल तर आमची शस्त्र कधी शमीच्या झाडावर नसतात. आमची शस्त्र ही कायम आमच्या कमरेवरच असतात, असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले.

“शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर भाजपचा सन्मान राहिला असता”

“दसरा मेळावा राजकीयच असतो. तो एक ऐतिहासिक मेळावा असतो. पुढच्या वर्षी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं मी म्हणालो होतो. अनेकांना प्रश्न पडला. पण माझा आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला होता,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर भाजपचा सन्मान राहिला असता. आम्ही त्यांना भूमिका घ्या असे सांगत होतो, त्यांनी ती भूमिका बिहारमध्ये घेतली. नितीशच्या जागा कमी ती भूमिका बिहारला घेता, पण महाराष्ट्रात मात्र नाही. आम्ही निष्ठावंत जुने आहोत. नितीशकुमार हे पेईंगगेस्ट आहेत. ते जाऊन येऊन असतात. त्यांच्या बाबत मात्र सकारात्मक भूमिका घेतली,” अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

“आम्ही कशाला चिटींग करु, तुम्ही चिटींग करत होतात. आम्ही ती उधळून लावली,” असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले. (Sanjay Raut Exclusive Interview Before Shivsena Dasara melava)

संबंधित बातम्या : 

मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

‘भाजपनं बिहारमध्ये जनाची आणि मनाचीही बाळगावी’!, दसरा मेळाव्यावरील विरोधकांच्या टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.