AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही जिथ बसू तिथं सरकार येणार, आम्ही उठलो की सरकार कोसळणार!- बच्चू कडू

Bacchu Kadu on Vidhansabha Election 2024 : 2024 ला प्रहारचे 10-11 आमदार निवडून येणार,आम्ही जिथ बसू तिथं सरकार येणार... आम्ही उठलो की सरकार कोसळणार! आम्ही ठरवू ते सरकार सत्तेत येईल; बच्चू कडू यांचं वक्तव्य

आम्ही जिथ बसू तिथं सरकार येणार, आम्ही उठलो की सरकार कोसळणार!- बच्चू कडू
| Updated on: Aug 24, 2023 | 10:49 AM
Share

सातारा | 24 ऑगस्ट 2023 : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सगळेच राजकीय पक्ष आपले अधिकाधिक उमेदवार निवडणूक येणार असल्याचा दावा करत आहेत. शिवसेना-भाजप आणि अजित पवार गटाच्या युतीतील नेते पुन्हा युतीचंच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा दावा करत आहेत. आमदार बच्चू कडू यांनीही प्रहारचे 10-11 आमदार निवडणून येतील असा दावा केला आहे. शिवाय कुणाचं सरकार सत्तेत येईल, याविषयीही त्यांनी मोठा दावा केला आहे. बच्चू कडू साताऱ्यात बोलत होते.

बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. आमचे 10 ते 11 आमदार निवडून येतील. आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल. आम्ही उठलो तर सरकार उठेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

येत्या काळात विधानसभा निवडणुका लागतील. यात युतीमध्ये किती जागा मागणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी साताऱ्यात सांगितलं आहे.

महायुतीत एकनाथ शिंदे,अजित पवार आणि भाजप एवढे पक्ष असताना तुम्हाला 15 जागा मिळतील का?, असा सवाल केला गेला तेव्हा तो अभ्यास त्यांनी करावा. ते माझे काम नाही, असं बच्चू कडू म्हणालेत. त्यामुळे येत्या काळात बच्चू कडू यांच्या प्रहारला युतीत किती जागा मिळतात आणि किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं महत्वाचं असेल.

दोन दिवसाआधीही बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारला नामर्द संबोधलं होतं. केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर घणाघात केला होता. त्यानंतर आता आज त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं. म्हणून तुम्ही एवढे घाबरता का?, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला होता. केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे सत्तेत असतानाही प्रसंगी सरकारविरोधी भूमिका घेणारे नेते, अशी बच्चू कडू यांची ओळख होत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.