AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता राजकारण तरुणांच्या हातात, शरद पवार यांनी पुनर्विचार करावा किंवा थांबावे…भुजबळ यांनीही दिला सल्ला

ncp leader chhagan bhujbal | राष्ट्रवादी पक्षाला आता हे जे चिन्ह मिळाले, त्याचा सगळा वाटा माझा आहे. कारण हे चिन्ह मिळविण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे आता वाईट वाटून घ्यायचे कारण नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

आता राजकारण तरुणांच्या हातात, शरद पवार यांनी पुनर्विचार करावा किंवा थांबावे...भुजबळ यांनीही दिला सल्ला
chagan bhujbalImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Feb 11, 2024 | 2:41 PM
Share

अभिजित पोते, पुणे, दि. 11 फेब्रुवारी 2024 | आज जमाना तरुणांचा आहे. राजकारण तरुणांच्या हातात आहे. शरद पवार आणि त्यांच्या सोबती असणाऱ्यांना या सर्वांनी पुनर्विचार करायला हवा. त्यांनी पुनर्विचार केला नाही तर किमान थांबायला हवे. तुमच्या पुढे काय ठेवले ते पहा. मी पण राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मापासून पक्षात होतो. मात्र आता महिला, पुरुष आणि तरुणांचे जे संघटन अजितदादांच्या माध्यमातून उभारले आहे ते पहा आणि पुनर्विचार करा, असा सल्ला अन् हल्ला ओबीसी नेते आणि अजित पवार गटाचे पदाधिकारी छगन भुजबळ यांनी केला. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवार यांना सल्ला दिला. यापूर्वी अजित पवार यांनीही भुजबळ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता.

रोहित पवार यांच्यावर घणाघात

कर्जत जामखेडचे तरुण जाणते नेते आहेत. ते स्वतःला तरुणांचे नेते मानतात. पण त्यांच्या आजूबाजूला पगारी तरुण असतात, इथं बघा स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत, असा हल्ला आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता छगन भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, कोण म्हणतं पक्ष चोरला, कोणी आणखी काही म्हणते. मात्र लक्षात ठेवा लोकशाही आहे. ज्याच्या बाजूने बहुमत आहे, त्यांच्याबाजूने निर्णय लागतो. म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह ही मिळाले आहे.

चिन्ह मिळवण्यात माझा वाटा

राष्ट्रवादी पक्षाला आता हे जे चिन्ह मिळाले, त्याचा सगळा वाटा माझा आहे. कारण हे चिन्ह मिळविण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळं आता वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. पक्षातील कार्यकर्त्यांना सल्ला देताना त्यांनी म्हटले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. यात जीव तोडून काम करावे. आपल्या कामाचा हिशोब केला जाईल. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचा विचार केला जाईल. एकमेकांचे पाय खेचणे बंद करा. खेकड्याच्या वृत्तीने काम करू नका. संकटं खूप येणार, अडचणी येणार. काळजी करू नका.

आपण दोन नंबरचा पक्ष

आपण जरी भाजप सोबत गेलो असलो तरी आमची विचारसारणी तीच आहे. त्यात बदल झाला नाही. भाजपनंतर राज्यात दोन नंबरचा आपला पक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची आधीपासून भूमिका आहे. आम्ही दरवेळेस पाठिंबा दिला आहे. अजूनही देऊ,आता देखील मराठा आरक्षणासाठी खंबीर पाठिंबा देऊ. परंतु कुठल्याही एका समाजाला दुखावून चालणार नाही. सगळ्या समजाला सोबत घेऊन पुढे जावं लागेल.

दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे

आता अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे सगळी शक्ती घेवून पुढे जावे लागणार आहे. पाय घसरला तर उभा टाकता येतो. मात्र जीभ घसरली तर आयुष्यभर माणूस उठू शकत नाही. कुणालाही दुखवू नका, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.