AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीची यादी कधी, वंचितसाठी काय आहे प्रस्ताव? संजय राऊत यांनी सर्वच सांगितले

बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात. त्यांच्यामध्ये समाज हित असतं. हिच त्यांची ताकद आहे. आम्ही वारंवार संवाद साधून आहोत. बाळासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आम्हाला माहीत आहे. त्यांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे. त्यांचे संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत आहे.

महाविकास आघाडीची यादी कधी, वंचितसाठी काय आहे प्रस्ताव? संजय राऊत यांनी सर्वच सांगितले
| Updated on: Mar 26, 2024 | 12:03 PM
Share

महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरु आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील बरेचसे उमेदवार जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेची पहिली यादी तयार झाली आहे. आज दिवसभरात ती आम्ही प्रसिद्धीला देऊ. तसेच महाविकास आघाडीकडून बाळासाहेब आंबेडकरांना चार जागांचा दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पूर्वी जागा वाटपासाठी मातोश्रीवर बैठका होत होत्या. आता त्यांना दिल्लीत जावं लागतं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागलं. पण छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने स्वतः घेतला. आम्हाला दिल्लीत जाण्याची गरज लागली नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात. त्यांच्यामध्ये समाज हित असतं. हिच त्यांची ताकद आहे. आम्ही वारंवार संवाद साधून आहोत. बाळासाहेब आंबेडकरांचे विचारधारा आम्हाला माहीत आहे. त्यांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे. त्यांचे संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत आहे.

मोघल काळात मंडलिक संस्थानांचे वर्चस्व होतं. ते सध्या महाराष्ट्रमध्ये आहे. स्वतः निर्णय घेण्याची कुवत आणि हिम्मत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये नाही. रामलीला मैदानावर महारॅली आहे. देशभरातून हुकुमशाही विरोधात लोक एकवटणार आहे. देशावरती हुकूमशाहीचा राज्य सुरू आहे. त्या विरोधात आम्ही सर्व एकवटणार आहोत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे शरद पवार हे त्या मेळाव्याला उपस्थित राहतील. या देशात लोकशाही आहे. मुंबईत आम्ही शिवाजी पार्कच्या जागेसाठी परवानगी मागितली आहे.

उदयनराजे आमच्यासाठी प्रिय आहेत. आमच्यासाठी आदर्श आहेत. छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा तिकीट द्यायचे होते त्यावेळी आम्ही एकमेकांना विचारून निर्णय घेतला. आम्हाला दिल्लीत जाऊन कोणाच्या नावावर बसायची गरज लागली नाही. कंगना राणावत या अभिनेत्री आहेत पद्मश्री आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्याला आम्ही काय आक्षेप घेणार? तिच्यासोबत व्यक्तिगत संघर्ष असल्याचा कारणच नाही. मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावर कार्यवाही केली होती. कारण बेकायदेशीर काम झाले होते.

अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी
अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी.
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
... म्हणून हा कट शिजला, अन् ठिणगी पडली! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.