AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला

सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism) 

ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला
| Updated on: Nov 30, 2020 | 4:01 PM
Share

मुंबई : “राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

“ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही,” असेही अनिल परब म्हणाले.

“कारशेडसाठी जमिनीबाबत आम्ही अभ्यास करुनच कांजूरमार्गला नेण्याचा संकल्प केला. मराठा आरक्षण टिकावं यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. चर्चा सुरू आहे. मात्र हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ,” अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

“अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव विधानपरिषदेसाठी पाठवलं आहे. त्या उद्या देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करु शकतात. विधानपरिषदेसाठी कॅबिनेटची मान्यता घेऊन नावं पाठवली आहेत. त्यामुळे सध्या निर्णयाची वाट पाहत आहोत,” असेही परब म्हणाले.

“हिवाळी अधिवेशनाबाबत परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय”

“पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेबाबत अद्याप काहीही माहिती नाही. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनाबाबत 4 डिसेंबरला सल्लागार समितीची मीटिंग होईल. त्यावेळी परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय होईल,” असेही अनिल परब यांनी सांगितले.(Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

संबंधित बातम्या : 

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

फडणवीसांच्या काळातच मराठा, धनगर मोर्चे निघाले, प्रश्न मार्गी का लावले नाही?; शशिकांत शिंदेंचा सवाल

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.