AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला

सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism) 

ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला
| Updated on: Nov 30, 2020 | 4:01 PM
Share

मुंबई : “राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

“ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही,” असेही अनिल परब म्हणाले.

“कारशेडसाठी जमिनीबाबत आम्ही अभ्यास करुनच कांजूरमार्गला नेण्याचा संकल्प केला. मराठा आरक्षण टिकावं यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. चर्चा सुरू आहे. मात्र हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ,” अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

“अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव विधानपरिषदेसाठी पाठवलं आहे. त्या उद्या देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करु शकतात. विधानपरिषदेसाठी कॅबिनेटची मान्यता घेऊन नावं पाठवली आहेत. त्यामुळे सध्या निर्णयाची वाट पाहत आहोत,” असेही परब म्हणाले.

“हिवाळी अधिवेशनाबाबत परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय”

“पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेबाबत अद्याप काहीही माहिती नाही. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनाबाबत 4 डिसेंबरला सल्लागार समितीची मीटिंग होईल. त्यावेळी परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय होईल,” असेही अनिल परब यांनी सांगितले.(Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

संबंधित बातम्या : 

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

फडणवीसांच्या काळातच मराठा, धनगर मोर्चे निघाले, प्रश्न मार्गी का लावले नाही?; शशिकांत शिंदेंचा सवाल

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक