AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला

सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism) 

ठाकरे सरकारने वर्षभर काम केलंय, त्यासाठी राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही, अनिल परबांचा टोला
| Updated on: Nov 30, 2020 | 4:01 PM
Share

मुंबई : “राज्यातील ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, अशी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत, असा टोला अनिल परब यांनी लगावला. (Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

“ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही,” असेही अनिल परब म्हणाले.

“कारशेडसाठी जमिनीबाबत आम्ही अभ्यास करुनच कांजूरमार्गला नेण्याचा संकल्प केला. मराठा आरक्षण टिकावं यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. चर्चा सुरू आहे. मात्र हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ,” अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

“अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं नाव विधानपरिषदेसाठी पाठवलं आहे. त्या उद्या देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करु शकतात. विधानपरिषदेसाठी कॅबिनेटची मान्यता घेऊन नावं पाठवली आहेत. त्यामुळे सध्या निर्णयाची वाट पाहत आहोत,” असेही परब म्हणाले.

“हिवाळी अधिवेशनाबाबत परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय”

“पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेबाबत अद्याप काहीही माहिती नाही. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनाबाबत 4 डिसेंबरला सल्लागार समितीची मीटिंग होईल. त्यावेळी परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय होईल,” असेही अनिल परब यांनी सांगितले.(Anil Parab Comment On Narayan Rane Criticism)

संबंधित बातम्या : 

सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा

फडणवीसांच्या काळातच मराठा, धनगर मोर्चे निघाले, प्रश्न मार्गी का लावले नाही?; शशिकांत शिंदेंचा सवाल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.