AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी, शिवसेना, आर्यन खानच्या पाठिशी? मलिकांनंतर आता अरविंद सावंत यांची ‘मुंबईची बात’

क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणाचा भांडाफोड करून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अडचणी वाढवल्या आहेत. क्रूझवर ड्रग्जच आढळलं नसल्याचं सांगत मलिक यांनी आर्यन खान यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे. (Shivsena Leader Arvind Sawant attacked NCB Over Aryan khan Drugs case)

राष्ट्रवादी, शिवसेना, आर्यन खानच्या पाठिशी? मलिकांनंतर आता अरविंद सावंत यांची 'मुंबईची बात'
arvind sawant
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 12:26 PM
Share

मुंबई: क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणाचा भांडाफोड करून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अडचणी वाढवल्या आहेत. क्रूझवर ड्रग्जच आढळलं नसल्याचं सांगत मलिक यांनी आर्यन खान यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेनेही आर्यनची बाजू उचलून धरत मुंबईची बात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनाही आर्यनच्या पाठिशी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एनसीबीच्या कारवाईवरून जोरदार टीका केली आहे. सीबीआय, ईडी, आयकर या तपास यंत्रणा देशात कोणतेही काम करत नाही. देशात यांच्या कारवाया होत नाही. केवळ महाराष्ट्रातच सर्व भ्रष्ट माणसं आहेत अशा पद्धतीनेच या कारवाया सुरू आहेत. यामागे मुंबईसह महाराष्ट्राला आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला आहे. यापूर्वीही शिवसेना नेते संजय राऊत यांनी आर्यन याच्यावरील कारवाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

पदामुळे सुक्ष्म नाव आलं

यावेळी अरविंद सावंत यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनाही टोले लगावले. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आपलं नाव बारीक अक्षरात छापण्यात आल्याचं सांगत राणेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर, राणेंचं पद सुक्ष्म आहे. त्यामुळे त्यांचं नाव सुक्ष्म अक्षरात छापल्याचा टोला सावंत यांनी लगावला आहे.

शाहरुखच्या मुलाची केस एवढी महत्त्वाची आहे का?

दरम्यान, एनसीबीच्या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच केंद्र सरकारला धारेवर धरले होते. एनसीबीच्या कारवाईवरून शिवसेनेने भाजपला घेरलं आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!, शाहरुख खानच्या मुलाची केस तुम्हाला एवढीच महत्त्वाची वाटते का?, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली होती.

राऊत नेमकं काय म्हणाले?

शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्राने चार शेतकरी चिरडून मारले, यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्त्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा व त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचे कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. त्यांच्यावर कायद्याने कठोरात कठोर कारवाई होईलच, पण शाहरुख पुत्राच्या कृत्याचे ढोल बडविताना मीडियाने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्यांवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला. लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्यांनी देश हादरला आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या:

आर्यन खाननं पार्टीत ड्रग्ज घेतलं होतं की नाही? लाखमोलाच्या सवालाचं NCB च्या पंचनाम्यात उत्तर

“बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येत आहे”

Ajit Pawar IT raid : अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर छापे

(Shivsena Leader Arvind Sawant attacked NCB Over Aryan khan Drugs case)

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....