AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant Attack : उदय सामंतांवरील हल्ला ही तर उत्सफूर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंकडून हल्ल्याचं समर्थन

Uday Samant Attack : सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रं सादर केलं आहे. त्यातून शिंदे गटांचे सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. फुटीर गटाने सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न केलेल्या आहे. अध्यक्षांची निवड, बहुमत जे सिद्ध करून दाखवलं आहे.

Uday Samant Attack : उदय सामंतांवरील हल्ला ही तर उत्सफूर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंकडून हल्ल्याचं समर्थन
उदय सामंतांवरील हल्ला ही तर उत्सफूर्त प्रतिक्रिया; सुभाष देसाईंकडून हल्ल्याचं समर्थन Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2022 | 11:56 AM
Share

नवी दिल्ली: शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत (uday samant) यांच्यावर करण्यात आलेल्या हल्यावरून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या हल्ल्याचा उदय सामंत, आमदार तानाजी सावंत यांनी निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी तर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. राज्यात अशा प्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे, असं सांगतानाच हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर, शिवसेना नेते सुभाष देसाई (subhash desai) यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. ही तर कार्यकर्त्यांची उत्सुफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. देसाई यांनी हे विधान केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना आता बंडखोरांबाबत अधिक आक्रमक झाल्याचंही सांगितलं जात आहे.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उदय सामंत यांच्यावरील हल्ला ही उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेनेतून ही पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

कोर्टाचा आदेश शिरसावांद्य

दरम्यान, सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रं सादर केलं आहे. त्यातून शिंदे गटांचे सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. फुटीर गटाने सरकार स्थापन करण्याचा जो प्रयत्न केलेल्या आहे. अध्यक्षांची निवड, बहुमत जे सिद्ध करून दाखवलं आहे. त्याला आम्ही आक्षेप घेतला आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश शिरसावंद्य असतात. त्यामुळे सर्व प्रकारचे सहकार्य न्यायव्यवस्थेला करत असतो. जिथे जिथे अन्याय होईल तिथे दाद मागणारच, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सहा जणांना अटक

दरम्यान, काल उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, संजय मोरे आणि बबन थोरात आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. बबन थोरात यांनी चिथावणीखोर भाषण केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी जो रूट ठरवून देण्यात आला होता, त्या रूटने उदय सामंत न जाता दुसऱ्या रूटने उदय सामंत यांची गाडी गेली, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगनाथ कळसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Follow Us
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...