AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसे-पंकजा पराभवाने सैरभैर, ‘तरुण भारत’चा हल्लाबोल, ‘लोकांच्या मनातला मुख्यमंत्री’वरुनही टोले

गोपीनाथ गडावर दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या अयोग्य बोलले आहेत, असं म्हणत 'लोकांच्या मनातला मुख्यमंत्री' या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली.

खडसे-पंकजा पराभवाने सैरभैर, 'तरुण भारत'चा हल्लाबोल, 'लोकांच्या मनातला मुख्यमंत्री'वरुनही टोले
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 14, 2019 | 11:04 AM
Share

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या किंवा एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजप बहुजनांचा पक्ष झाला असता का? असा जळजळीत सवाल करत रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून खडसे-मुंडेंना लक्ष्य ( Tarun Bharat on Khadse Pankaja) करण्यात आलं आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता नागपूर तरुण भारत वृत्तपत्राच्या अग्रलेखातून दोघांचे कान टोचण्यात आले आहेत.

रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या किंवा एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले असते, तर मग भाजप बहुजनांचा पक्ष झाला असता का? आता यापैकी काहीच नाही, तर तो एकदम ‘मूठभर’ लोकांचा झाला का? असा प्रश्न ‘तरुण भारत’मधून विचारण्यात आला आहे.

अहंकारामुळे आपल्या पराभवाचं आत्मपरीक्षण करता येत नाही. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे अहंकारी झाले आहेत. गोपीनाथ गडावर दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या अयोग्य बोलले आहेत, असं म्हणत ‘लोकांच्या मनातला मुख्यमंत्री’ या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली.

VIDEO : खडसेंबाबत प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर हात जोडले

करण्यात आली आहे. नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत, पंकजा मुंडे यांनीही तसंच मन बनवल्याची शक्यता आहे, एका पराभवाने पंकजा आणि एकनाथ खडसे सैरभैर झाले आहेत, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ असे नामाभिधान लावून घेतो किंवा ‘मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो’ असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते ‘पोलिटिकली इन्करेक्ट’ (राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते, असेही अग्रलेखात ( Tarun Bharat on Khadse Pankaja) म्हटले आहे.

Follow Us
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज