Eknath Shinde : संजय शिरसाटांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी स्वतः सांगतो की…

CM Eknath Shinde on Sanjay Shirsat Statement about Devendra Fadnavis : संजय शिरसाट यांचं देवेंद्र फडणवीसां यांच्याबाबत केलेलं 'ते' वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यावरून टीका टिपण्णी सुरु आहे. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? वाचा...

Eknath Shinde : संजय शिरसाटांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी स्वतः सांगतो की...
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 10:39 AM

रमेश शर्मा, प्रतिनिधी ठाणे | 09 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच असावेत. देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते आहेत. त्यांनी दिल्लीत जावं. देशासाठी चांगलं काम करावं, असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चा झाली. भाजपकडून शिरसाटांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं स्पष्टीकरणही शिरसाटांनी दिलं. या सगळ्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलंय.

संजय शिरसाट यांनी जे काही म्हटलं होतं. त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. मी स्वतः सांगतो की, महाराष्ट्रामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस- अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून चांगलं काम आमच्या सुरू आहे. राज्याचा विकास वेगाने होत आहे. त्यामध्ये आमच्या तिघांची टीम उत्तमपणे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव राहिलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी या राज्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहेत. आम्ही तिघेही एक टीम म्हणून आवश्यक आहोत. महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे जे अनुभव आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचा सर्वांगीन विकासासाठी आमच्या टीममध्ये आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विकास आवश्यक आहे. दिल्लीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत. शेवटी हा निर्णय देवेंद्रजी यांचा स्वतःचा असणार आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

आज आम्ही जे काम करत आहोत. एकत्र एक दिलाने काम करत आहोत. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी होतो. तेव्हापासून जनतेच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी आम्ही निर्णय घेत आहोत. अजितदादा आमच्यासोबत आलेत. त्यामुळे आमची एक मजबूत टीम तयार झाली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्...
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्....
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?.
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.