AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : संजय शिरसाटांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी स्वतः सांगतो की…

CM Eknath Shinde on Sanjay Shirsat Statement about Devendra Fadnavis : संजय शिरसाट यांचं देवेंद्र फडणवीसां यांच्याबाबत केलेलं 'ते' वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यावरून टीका टिपण्णी सुरु आहे. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री? वाचा...

Eknath Shinde : संजय शिरसाटांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावं; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी स्वतः सांगतो की...
| Updated on: Oct 09, 2023 | 10:39 AM
Share

रमेश शर्मा, प्रतिनिधी ठाणे | 09 ऑक्टोबर 2023 : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच असावेत. देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते आहेत. त्यांनी दिल्लीत जावं. देशासाठी चांगलं काम करावं, असं संजय शिरसाट म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चा झाली. भाजपकडून शिरसाटांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं स्पष्टीकरणही शिरसाटांनी दिलं. या सगळ्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलंय.

संजय शिरसाट यांनी जे काही म्हटलं होतं. त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. मी स्वतः सांगतो की, महाराष्ट्रामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस- अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून चांगलं काम आमच्या सुरू आहे. राज्याचा विकास वेगाने होत आहे. त्यामध्ये आमच्या तिघांची टीम उत्तमपणे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव राहिलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि मी या राज्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेत आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहेत. आम्ही तिघेही एक टीम म्हणून आवश्यक आहोत. महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे जे अनुभव आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचा सर्वांगीन विकासासाठी आमच्या टीममध्ये आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा विकास आवश्यक आहे. दिल्लीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत. शेवटी हा निर्णय देवेंद्रजी यांचा स्वतःचा असणार आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

आज आम्ही जे काम करत आहोत. एकत्र एक दिलाने काम करत आहोत. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी होतो. तेव्हापासून जनतेच्या हितासाठी, राज्याच्या हितासाठी आम्ही निर्णय घेत आहोत. अजितदादा आमच्यासोबत आलेत. त्यामुळे आमची एक मजबूत टीम तयार झाली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.