AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : जनतेला आपलसं वाटणारं सरकार, मुख्यमंत्र्यांनी सांगितला अडीच महिन्यातील अनुभव

सत्तांतर झाल्यानंतर जो आनंद सर्वसामान्य जनतेला झाला होता तोच आजही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यानंतर राज्यात होत असलेल्या सणासुदीवर कोणतेही निर्बंध नसल्याने जनतेचा उत्साह शिघेला पोहचला आहे. मागील दोन वर्ष राज्यात उदास वातावरण होते. पण आता सर्वकाही बदलल्याने नागरिकांच्या जीवनमानातही बदल होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

Eknath Shinde : जनतेला आपलसं वाटणारं सरकार, मुख्यमंत्र्यांनी सांगितला अडीच महिन्यातील अनुभव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 09, 2022 | 5:06 PM
Share

ठाणे : आतापर्यंत (Shiv sena Party) शिवसेनेकडून टीका केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल प्रतिक्रिया देत नव्हते. पण शिंदे गटाचा वारंवार गद्दार असा उल्लेख केला जात असल्याने (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेवर आणि पक्षप्रमुखांवर देखील (Blunt criticism) बोचरी टीका करण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात सणासुदीत देखील उदास वातावरण होते. मात्र, आमचे सरकार सत्तेत येताच यंदाचे सणोत्सव हे दणक्यात होणार असल्याचे जाहिर केले होते. शिवाय ज्यांच्याजवळ येऊ वाटते अशांना लोकही जवळ करतात. म्हणून दाखल होताच हजारोंची गर्दी होत आहे. आता ज्यांच्या जवळ लोकांनाच जाऊ वाटत नाही, त्यांच्याबद्दल काय सांगणार असा खोचक टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यावरुन त्यांनी पक्ष नेतृत्वालाच अव्हान दिले आहे.

सत्तांतरानंतर सर्वकाही उत्साहात

सत्तांतर झाल्यानंतर जो आनंद सर्वसामान्य जनतेला झाला होता तोच आजही त्यांच्या चेहऱ्यावर आहे. त्यानंतर राज्यात होत असलेल्या सणासुदीवर कोणतेही निर्बंध नसल्याने जनतेचा उत्साह शिघेला पोहचला आहे. मागील दोन वर्ष राज्यात उदास वातावरण होते. पण आता सर्वकाही बदलल्याने नागरिकांच्या जीवनमानातही बदल होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

जनतेचा गराडा हीच कामाची पावती

गेल्या 10 दिवसांपासून उत्सावाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावली आहे. जनतेला आपल्याजवळ येऊ वाटते हीच मोठी गोष्ट आहे. अन्यथा काहींच्या जवळ जाण्यासही जनता धजत नाही असे चित्र असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दिवसभरात 10 ते 20 मंडळांना भेटी आणि बाप्पांचे दर्शन यामुळे जनतेशी संपर्क तर राहिलाच पण मी दाखल होताच जनतेचा गराडा पडत होता. हीच आपल्या कामाची पावती असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

विरोधकांवर सडकून टीका

दसरा मेळाव्याबाबत वेळ आली की सांगितले जाणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल कुणाच्या हाती होते हे सर्वसामान्य जनतेला देखील ज्ञात होते. पण हे हातचे रिमोटच गेल्याने आता राष्ट्रवादीमध्ये चिडचिड होत असल्याचे म्हणत त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे याकूब मेनन हा बॉम्ब ब्लास्टचा आरोपी होता. त्याला फाशी दिली गेली असली तरी, त्याचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. पोलिस आणि मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत गृह विभाग योग्य ती कारवाई करेल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

Follow Us
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?