AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट
| Updated on: Feb 21, 2020 | 9:16 PM
Share

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली (Uddhav Thackeray meet Sonia Gandhi). ही भेट जवळपास 1 तास सुरु होती. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे, शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील हजर होते. या 1 तासाच्या भेटीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये काय नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्याप माध्यमांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे याविषयी कमालीची उत्सुकता तयार झाली आहे.

महाराष्ट्रात महाविकासआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः सध्याचा ज्वलंत विषय असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) यावर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचंही समोर आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींची घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काँग्रेस आणि शिवसेनेतील मतभेदाच्या विषयांवरही चर्चा झाली का? आणि काय चर्चा झाली याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला विरोध केला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एनपीआरला विरोध नसल्याचं म्हटलं आहे. मोदींची भेच घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीची माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या भेटीत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा केली. हा कायदा कुणाला देशातून काढण्यासाठी झालेला नाही. शेजारच्या राष्ट्रातील हिंदू बांधवांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. जनगणना होणं आवश्यक आहे. एनआरसी केवळ आसामपर्यंत मर्यादित राहिल. एनपीआर कुणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी नाही. लोकसंख्या मोजण्यासाठी दर 10 वर्षांनी एनपीआरची अंमलबजावणी होते. त्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह आढळलं तर तेव्हा नक्कीच आक्षेप घेऊ.”

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, आदित्य ठाकरेंचीही विशेष उपस्थिती

राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

Uddhav Thackeray meet Sonia Gandhi

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.