AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फुसका बार! ठाकरेंच्या सभेवर कुणाचा निशाणा?

दसरा मेळाव्याला झालेल्या ठाकरे आणि शिंदे यांच्या सभांपैकी नेमकी कुणाची सभा सरस ठरली, यावरुन राजकीय प्रतिक्रियांना वेग

उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फुसका बार! ठाकरेंच्या सभेवर कुणाचा निशाणा?
उद्धव ठाकरेImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 06, 2022 | 8:18 AM
Share

स्वप्निल उमप, TV9 मराठी, अमरावती : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Dussehra Melava Speech) यांची शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभा म्हणजे फुसका बार आहे, अशा शब्दांत रवी राणा (Ravi Rana) यांनी टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा आपल्यामध्ये आणली असल्यामुळे त्यांना हा देखावा करावा लागतोय, असंदेखील त्यांनी म्हटलंय. बाळासाहेबांच्या विचारधारेचा विसर पडल्यामुळे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिलाय, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं. ते अमरावतीत बोलत होते.

हिंदुत्त्वाचं नाव घेऊन, हिंदू विचारांची दिशाभूल ठाकरे करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय. हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज उद्धव ठाकरेंना का पडतेय, याचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्व आठवलं, हे त्यांचं दुर्भाग्य आहे, असंही ते म्हणाले.

‘ठाकरेंचं संतुलन बिघडलं’

दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलत होते, त्यावरुन त्यांचं संतुलन पूर्णपणे बिघडलंय, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेत स्पष्ट राग दिसून येत होता, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे वारंवार सांगतात की आमचा बाप चोरला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार होऊ शकतात. पण विचारधारा ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा विश्वास नवनीत राणा यांनी बोलून दाखवला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार शिंदेकडे होते म्हणूच एवढे लोक एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी आले होते, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीत बोलतेवेळी ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेवर निशाणा साधला. दसरा मेळाव्याला झालेल्या दोन सभांपैकी कुणाची सभा सरस ठरली? यावरुन आता राजकीय प्रतिक्रियांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.