AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : संघाची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातोय का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवाल

Uddhav Thackeray : तुम्हाला आमची भूमिका पटली. आपली युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाली नाही. आम्ही सत्तेत असताना आला आहात. सत्ता तर येणार आहे. काही नसताना तुम्ही मोलाची साथ देत आहात. हे महत्त्वाचं आहे. काही नसताना जी वैचारिक युती झाली आहे, महाराष्ट्रात जे घडवलं ते बिघडवलं.

Uddhav Thackeray : संघाची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातोय का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवाल
संघाची विचारधारा घेऊन भाजप पुढे जातोय का?; उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवालImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2022 | 2:30 PM
Share

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर आज जोरदार टीका केली. गेली 25 ते 30 वर्ष आम्ही हिंदुत्वाच्या स्वप्नापायी भाजपसोबत युती केली होती. संघाची एक विचार धारा आहे. पण संघाची विचारधारा घेऊन भाजप (bjp) पुढे जातोय असं वाटतं का? मातृसंघटनेची विचारधाराच भाजप मानत नसेल तर माझ्या पेक्षा तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा. संघाची (rss) विचारसरणी त्यांना मान्य आहे का? भाजप तसं वागत आहे का? मोहन भागवतांनी दोन चार वर्षापासून जे मते मांडलीत त्यानुसार तुम्ही वागताय का? असे प्रश्न विचारून उद्धव ठाकरे यांनी भाजपला भंडावून सोडलं. तसेच संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना निवडणुकीतही आणि वैचारिक पातळीवरही विरोधकांशी खांद्याला खांदा लावून लढणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणं, प्रादेशिक अस्मिता मारून टाकणं, इतर पक्ष संपवून टाकणं यालाच लोकशाही मानणारे काही लोकं आहेत. हे लोक बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे. न्याय देवतेवर विश्वास आहे. निकाल लागणार आहे. तो केवळ शिवसेनेचं भवितव्य ठरवणारा नाही तर यापुढे देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील हे ठरवणार असणार आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.

प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र या

विचार मजबूत करायचे असेल तर केवळ वैचारिक युती असं नसतं. केवळ रस्त्यावर उतरायचं असं नाही. मला तगडा सहकारी मिळाला आहे. खांद्याला खांदा लावून निवडणुका लढत असेल तर का लढू नये? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय. संभाजी ब्रिगेडचं अभिनंदन करतोय. आपण जो विचार करून सोबत आला आहात. गेले दोन महिने अनेक जण आपल्या विचाराचे आणि शिवसेनेच्या विचाराचे नाहीत तेही जवळ येत आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू. दुहीचा शाप मोडून टाकू, असं ते म्हणाले.

आमचं हिंदुत्व सोप्पं आहे

औरंगजेबाने सांगितलं होतं हे मराठे पराक्रमात यांना जगात तोड नाही. पण या भूमीत दुहीची बीजं खडकावर जरी फेकली तरी ती हा हा करून फोफावतात आणि वाढतात. हे आजपर्यंत आपल्या शत्रूलाही कळलं. पण आपल्याला कळलं नाही, असं म्हणणार नाही. पण कळलं तरी वळणार कसं? मला आनंद आहे. तुम्ही शिवसेनेसोबत आलात. पुरोगामी वगैरे शब्द कठिण आहे. पण आमचं सोप्पं आहे. हिंदुत्व सोप्पं आहे, असं त्यांनी सांगितलं.

वैचारिक युती झालीय

तुम्हाला आमची भूमिका पटली. आपली युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झाली नाही. आम्ही सत्तेत असताना आला आहात. सत्ता तर येणार आहे. काही नसताना तुम्ही मोलाची साथ देत आहात. हे महत्त्वाचं आहे. काही नसताना जी वैचारिक युती झाली आहे, महाराष्ट्रात जे घडवलं ते बिघडवलं. ती महाराष्ट्राची ओळख नाहीये. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तसं वागत नाही. पण दाखले देताना महाराजांचे देतात. आणि भलतंच वागतात, असा टोला त्यांनी भाजपला नाव न घेता लगावला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...