AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांची तोफ आजपासून धडाडणार, आजपासून दौरे; विदर्भातील ‘या’ नेत्याच्या मतदारसंघातून वारप्रतिवार

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालपासून राज्यात सभांचा धडाका लावला आहे. शरद पवार यांनी काल नाशिकच्या येवला येथे सभा घेतली.

उद्धव ठाकरे यांची तोफ आजपासून धडाडणार, आजपासून दौरे; विदर्भातील 'या' नेत्याच्या मतदारसंघातून वारप्रतिवार
Uddhav ThackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2023 | 7:15 AM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेत पडलेली फूट आणि राष्ट्रवादीत झालेली बंडाळी या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत. विदर्भातील यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय झंझावाती दौरा सुरू होणार आहे. यावेळी ते जनतेशी संवाद साधणार असून आपली भूमिका मांडणार आहे. यावेळी राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि शिंदे गटावर काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालपासून राज्यात सभांचा धडाका लावला आहे. शरद पवार यांनी काल नाशिकच्या येवला येथे सभा घेतली. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातच पवार यांनी पहिली सभा घेऊन भुजबळांना आव्हान दिलं. शरद पवार यांच्या सभांचा धडाका सुरू झालेला असतानाच आता उद्धव ठाकरेही सभांचा धडाका लावणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यात ते जाणार आहेत.

या जिल्ह्यात जाणार

उद्धव ठाकरे पहिल्या टप्प्यात विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचनाही देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पहिला दौरा यवतमाळमध्ये

मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. दारव्हा-दिग्रस येथील पोहरादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू होणार आहे. दुपारी 2 वाजता ते दारव्हा दिग्रस येथे दाखल होणार आहे. यावेळी ते संजय राठोड यांचा खरपूस समाचार घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

असा असेल आजचा दौरा

दुपारी 2 वा. पोहरादेवी दर्शन

दुपारी 3 वा. यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

दुपारी 3.30 वा. वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सायंकाळी 4 वा. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

उद्याचा दौरा

सकाळी 11 वा. अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळी 11.30 वा. अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

दुपारी 1 वा. अमरावती व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

सायंकाळी 6 वा. नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

स्थळ : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.