काँग्रेस 14 महिन्यांपूर्वी सोडली, पण राजकारण नाही, जमिनीवर उतरुन तळागळात पोहोचायचंय : उर्मिला मातोंडकर

"चित्रपटसृष्टीत असताना लोकांनीच मला स्टार केलं. त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लिडर होणं पसंत करेल", अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी दिली (Urmila Matondkar said I left congress from 14 month ago).

काँग्रेस 14 महिन्यांपूर्वी सोडली, पण राजकारण नाही, जमिनीवर उतरुन तळागळात पोहोचायचंय : उर्मिला मातोंडकर
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 5:43 PM

मुंबई : “मी काँग्रेस पक्ष सोडून 14 महिने झाले आहेत. मी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडली तेव्हा पक्ष सोडत आहे पण लोकांकरीता काम करत राहील असं म्हटलं होतं. मी तेव्हा राजकारण सोडलं नव्हतं. आताही माझ्यात जितकी क्षमता आहे त्या क्षमतेने जमिनीवर उतरुन काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण एसी रुममध्ये बसून या गोष्टी होतील असं वाटत नाही. आज मी लोकांकडून थोडा वेळ मागत आहे. मला थोडा वेळ द्या”, अशी विनंती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी जनतेला केली. शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या (Urmila Matondkar said I left congress from 14 month ago).

“जेव्हा मी चित्रपटसृष्टीत 29-30 वर्षांपूर्वी माझी कारकिर्द सुरु केली तेव्हा मी अत्यंत साध्यासुध्या मराठमोळ्या घरातून आलेली मुलगी होती. आईला मेकअपबाबत काहीही कल्पना नव्हती. पण लोकांची साथ होती. आज मी माझ्या राजकीय वाटचालीत नवं पाऊल उचललं आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की, ही एक अजून एक अवघड वाट आहे. यासाठी लोकांचा पाठिंबा गरजेचा आहे. चित्रपटसृष्टीत असताना लोकांनीच मला स्टार केलं. त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लिडर होणं पसंत करेल”, असं उर्मिला म्हणाल्या.

“मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने खरंच वाखणण्याजोगे कामगिरी केलं आहे. गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्र अतिशय कठीण काळातून जात होता. कोरोना संकट, अतिवृष्टी, चक्रीवादळ या सरख्या संकटांना महाराष्ट्राने तोंड दिलं. या काळात सरकारने वाखणण्याजोगं काम केलं आहे”, अशा शब्दात उर्मिला यांनी राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं.

“शिवसेनेची महिला आघाडी खूप भक्कम आहे. मला शिवसेनेचा भाग झाल्याचा आनंद आहे. मुंबईत महाराष्ट्र आणि जगभरातून असंख्य मुली येतात. त्यांचे आई-वडील अत्यंत आत्मविश्वासाने पाठवतात की, आमच्या मुली मुंबईत सुखरुप आहेत. मला अत्यंत आनंद आणि अभिमान हे की त्या मुंबई शहराचा मी भाग आहे. महिला सुरक्षेबाबतचे अनेक समस्या आहेत. त्यासाठी मला काम करायचे आहे”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या (Urmila Matondkar said I left congress from 14 month ago).

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते कुटुंबप्रमुख बनले : उर्मिला मातोंडकर

होय, मी काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर नाकारली; शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांचा खुलासा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.