AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेससोबत चर्चा बंद, एमआयएमसाठी दारं अजूनही खुली : प्रकाश आंबेडकर

राज्यात मित्र पक्षाबरोबर आम्ही 288 जागा लढवणार असल्याचं सांगत त्यांनी (VBA Prakash Ambedkar) पुन्हा एमआयएम बरोबर युतीचे संकेत दिले. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आजही माझे चांगले संबंध असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं.

काँग्रेससोबत चर्चा बंद, एमआयएमसाठी दारं अजूनही खुली : प्रकाश आंबेडकर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 23, 2019 | 5:59 PM
Share

पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडी बरोबरची चर्चा थांबलेली आहे. मात्र एमआयएम बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे आहेत. मात्र त्यांनी कुलूप लावलं असून चावीही त्यांच्याकडेच आहे. एमआयएमने दरवाजा उघडावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (VBA Prakash Ambedkar) यांनी केलं. राज्यात मित्र पक्षाबरोबर आम्ही 288 जागा लढवणार असल्याचं सांगत त्यांनी (VBA Prakash Ambedkar) पुन्हा एमआयएम बरोबर युतीचे संकेत दिले. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत आजही माझे चांगले संबंध असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं.

26 तारखेपर्यंत अंतिम यादी

विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर 288 जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचं काम सुरु असून पहिली यादी मंगळवारी जाहीर होईल. उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

“आमचं सँडविच करण्याचा डाव होता”

काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. सत्ताधारी सरकार दोन्ही पक्षातील दागी नेत्यांवर बोलत होते. चर्चेत खेळवत ठेवून आमचं सँडविच करण्याचा डाव होता. मात्र हे राजकारण लक्षात आल्यावर आम्ही चर्चा थांबवली, असा दावा आंबेडकरांनी केला. आघाडीबरोबर बोलायचं नाही, मित्रपक्षाला बरोबर घेऊन 288 जागा लढण्याची आमची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

“युतीने डागाळलेल्या नेत्यांसोबत कोणती सेटलमेंट केली?”

काँग्रेस-राष्ट्रवादीतील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्यांवर कारवाई होणं, त्यांची चौकशी होऊन न्यायालयात उभा करणं आवश्यक होतं. मात्र असं काहीच घडलं नाही. त्यामुळे युतीने डागाळलेल्या नेत्यांबरोबर काय समझोता केला हे जाहीर करावं, असं आव्हान आंबेडकर यांनी दिलं. स्वच्छ सरकार म्हणतात, कायदा-सुव्यवस्थेचा सरकार गेलं कुठं, असा सवालही त्यांनी केला.

आम्ही राज्यात एक जातीय सत्ता आणणार नाही. यापूर्वी एका जातीच्या सत्तेतून कुटुंबशाही निर्माण केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. मात्र आम्ही लोकशाहीचं सार्वत्रीकरण करतोय. पण आम्हाला जातीयवादी म्हणून ठपका मारत आहे. पण आघाडी आणि युतीने कोणकोणत्या समाजाचे उमेदवार दिले याबाबत माहिती द्यावी, असं आव्हानही आंबेडकरांनी दिलं.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली