AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज, मात्र आजही अत्यंत गरीब असून अडगळीत पडलाय : विजय वडेट्टीवार

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार ओबीसींना अधिक निधी मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत (Vijay Wadettiwar on meeting of OBC leader and fund demand).

महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज, मात्र आजही अत्यंत गरीब असून अडगळीत पडलाय : विजय वडेट्टीवार
| Updated on: Sep 29, 2020 | 5:10 PM
Share

मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार ओबीसींना अधिक निधी मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत (Vijay Wadettiwar on meeting of OBC leader and fund demand). महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज आहे, मात्र तो आजही अत्यंत गरीब असून अडगळीत पडलाय, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीला अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि संजय राठोड असे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी आहेत. हा समाज अत्यंत गरीब असून अडगळीत पडला आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना स्वतंत्र वसतिगृह नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळा नाहीत, इतर सवलती नाही, स्कॉलरशिपलाही पैसे मिळत नाही. ओबीसी समाजासाठी निधी मिळाला पाहिजे. त्यासाठी आज ओबीसी नेते आणि आमदार यांची बैठक आहे. महामंडळं, त्याचे भाग भांडवल अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा होईल.”

“साडेसहा वाजता आम्ही सर्व भेटणार आहोत. या बैठकीत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि संजय राठोड हे सहभागी होणार आहेत. ओबीसींना लोकसंख्येनुसार निधी मिळाला पाहिजे. पदोन्नतीमधील आरक्षण भरलं पाहिजे. ओबीसी आरक्षण कमी झालं आहे. ओबीसी आरक्षण कायम राहिलं पाहिजे,” असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे. केंद्रामध्ये निर्णय घेण्यात आला असला तरी राज्यात एकत्र बसून चर्चा होते. या कायद्याबाबत आमचे नेते निर्णय घेतील. हे बिल शेतकरी विरोधी आहे. त्याची अंमलबजावणी होऊ नये. राज्य सरकारने तिच भूमिका घेतली पाहिजे.”

भाजपसह विरोधी पक्षांकडून राज्यात मध्यवर्ती निवडणुकांची चर्चा सुरु असल्याच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. कुणाला झोपेत स्वप्न पडतात, कोणाला जागेपणी पडतात. हा ज्याचा त्याचा भाग आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून विदर्भातील पूरग्रस्त प्रत्येक‌ जिल्ह्याला मदत‌ केली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली.

विदर्भातल्या पूरग्रस्तांना 162 कोटी रुपयांची मदत

नागपूर – 45 कोटी

वर्धा – 69 लाख

भंडारा – 42 कोटी

गोंदिया – 12.5 कोटी

चंद्रपूर – 38 कोटी‌

गडचिरोली – 24.50 कोटी

हेही वाचा :

वडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप

आता ओबीसींनाही हवाय ज्यादा निधी, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

Chandrapur Flood | पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजारांची तातडीची मदत, थेट खात्यात पैसे जमा होणार – विजय वडेट्टीवार

व्हिडीओ पाहा :

Vijay Wadettiwar on meeting of OBC leader and fund demand

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.