AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut : आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली; नीच राजकारण सुरूये, दसरा मेळाव्यावरून राऊतांचा टोला

Vinayak Raut सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू आहे, दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून केव्हाच पत्र पाठवण्यात आलं आहे.  आधी परवानगी दिली आणि नंतर आता ते बदलले असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Vinayak Raut : आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली; नीच राजकारण सुरूये, दसरा मेळाव्यावरून राऊतांचा टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2022 | 2:09 PM
Share

मुंबई : यंदा शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा होणार का?  दसरा मेळावा झालाच तर तो कोणाचा होणार, शिंदे गट की उद्धव ठाकरे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.  त्यावरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झालीये.  यावर शिवसेना (Shiv Sena) नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गट आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू आहे, दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून केव्हाच पत्र पाठवण्यात आलं आहे.  आधी परवानगी दिली आणि नंतर आता ते बदलले,अडचणी सांगण्यास सुरुवात केली असं राऊत यांनी  म्हटलं आहे. तर दुसरीकडे जे नियमात आहे तेच होईल, सरकार नियमाबाहेर जाऊन कोणतेही काम करत नसल्याची प्रतिक्रिया यावर बोलताना फडणवीसांनी दिली आहे.

नेमकं काय म्हटलं राऊतांनी?

शिवाजी पार्कमध्ये यंदा दसरा मेळावा होणार का? झाल्यास कोणाचा होणार यावर बोलताना विनायक राऊत यांनी शिंदे गटाला जोरदार टोला  लगावला आहे. सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा चालू आहे. यंदा देखील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी केव्हाच पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी आधी परवानगी दिली, मात्र आता पलटी खाल्ली आहे.  राजकारणाची हद्द पार झालीये, नीच राजकारण सुरू असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

‘गणेश मंडळांवर शिंदे गटाची उधळपट्टी ‘

यावेळी बोलताना राऊत यांनी शिंदे गटाकडून गणेश मंडळांवर उधळपट्टी सुरू असल्याचं  म्हटलं आहे. त्यांनी खोके कमावले आहेत, मग आता खर्च तर होणारच. खर्च करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. यंदा फक्त मंडळांकडूनच उधळपट्टी होईल असं वाटत नाही. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी निवडणूक कधीही झाली तर जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंनाच मिळेल असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी