AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर आणि राज्यातील ओबीसी मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल
| Updated on: Dec 13, 2020 | 2:59 PM
Share

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर आणि राज्यातील ओबीसी मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही मराठा नेत्याने केलेली नाही. अशावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत आहेत. सरकारला मराठा समजााला आरक्षण द्यायचं नाही का? ओबीसींचे मोर्चे, आंदोलने सरकार पुरस्कृत आहेत का? तसेच सरकारने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे का? असा सवाल विनायक मेटे यांनी केला आहे. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नाहीत. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे उद्या काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.

मेटेंचे सवाल

मराठा समाजातील कोणत्याही नेत्याने ओबीसींमधून आरक्षण मागितलेलं नाही. पण ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्री आणि राज्यातील ओबीसी नेते मराठा आरक्षणावरून बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी मोर्चे, आंदोलनंही सुरू केली असून वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी नेत्यांचे हे मोर्चे, मेळावे सरकार पुरस्कृत आहेत का? राज्यातील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि शेंडगे हे राज्यातील वातावरण खराब करत असून सरकारने त्यांच्यावर कोणताही अंकूश ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील वातावरण खराब करण्याचा निर्णय घेतला आहे का? दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे का? अशा प्रश्नांच्या फैरीही मेटे यांनी झाडल्या.

अजितदादा, थोरात, शिंदे गप्प का?

ओबीसी नेते, मंत्री आरक्षणावर बोलत असताना सरकारमधील मराठा मंत्री गप्प का बसलेले आहेत? छगन भुजबळ ओबीसी आरक्षणावर बोलतात मग उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत? विजय वडेट्टीवार बोलतात मग महसूल मंत्री बाळासाहेब थोरात का भूमिका घेत नाहीत? माजी आमदार प्रकाश शेंडगे बोलतात मग नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई मौन बाळगून का आहेत? मराठा आमदारही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

अधिवेशनात चर्चा व्हावी

राज्यात दोन दिवसाचं हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. मराठा आमदार आणि मंत्र्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन करतानाच मी सर्व मराठा आमदारांना पत्रं लिहून ही चर्चा घडवून आणण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं. (vinayak mete slams obc leader over maratha reservation)

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका, ओबीसी आरक्षण रद्द करण्याची सराटेंची मागणी  

SEBC म्हणजेच ओबीसी, हा प्रवर्ग जुनाच आहे : पी. बी. सावंत 

(vinayak mete slams obc leader over maratha reservation)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.