AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुका कधी? निवडणूक आयोगाच्या कामावर सर्वोच्च न्यायालय झाले खुश

निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्यासाठी काही नवीन नियम बनविण्याचे काम सुरु आहे. मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरु आहे. निवडणूक आयोग काही दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुका कधी? निवडणूक आयोगाच्या कामावर सर्वोच्च न्यायालय झाले खुश
Election ComissionImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Feb 13, 2024 | 9:57 PM
Share

नवी दिल्ली | 13 फेब्रुवारी 2024 : देशात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्यासाठी काही नवीन नियम बनविण्याचे काम सुरु आहे. मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरु आहे. निवडणूक आयोग काही दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या कामगिरीवर सर्वोच्च न्यायालय खुश असल्याचे दिसून येत आहे.

सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार यादीमध्ये खोट्या मतदारांचा समावेश आहे. तसेच, डुप्लिकेट मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत असा आरोप करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाचे वकील अमित शर्मा यांनी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार यादीबाबतची माहिती सादर केली.

वकील अमित शर्मा यांनी ‘शेवटच्या प्रकाशित यादीनुसार देशभरात 96.9 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. 18 ते 19 आणि 20 ते 29 वयोगटातील दोन कोटींहून अधिक मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे अशी माहिती दिली. मतदारांच्या डुप्लिकेट नोंदी आणि मृत मतदार यांना यादीतून वगळण्यासाठी निवडणूक आयोग पूर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी आयोग आणि बूथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत असेही त्यांनी सांगितले.

‘आयटी प्रणाली संभाव्य लोकसंख्याशास्त्रीय समान नोंदींची यादी तयार करत आहे. डीएसई आणि फोटो समान नोंदी (पीएसई), घरोघरी जाऊन पडताळणी करणे या कामांसाठी निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना (ERO/AERO) मदत करण्यासाठी आयटी प्रणाली हे उपयुक्त साधन आहे. यामुळे संबंधित कायदे आणि नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण होत आहे अशी माहितीही वकील अमित शर्मा यांनी दिली.

निवडणुका आयोगाच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने डुप्लिकेट आणि बनावट मतदारांना हटवण्यासाठी आयोग पुरेसे काम करत नाही, असे आरोप निवडणूक आयोगावर करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. तसेच, अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या आयोगाच्या कामावरही सर्वोच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...