AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई का नाही? : राज ठाकरे

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. या लोकसभा निवडणुकीतली त्यांची शेवटची सभा नाशिकमध्ये झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला. शिवाय विरोधी पक्षात असताना सिंचन घोटाळ्याप्रकरणी घसा फोडून ओरडणारं भाजप आता गप्प का आहे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई […]

अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर कारवाई का नाही? : राज ठाकरे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. या लोकसभा निवडणुकीतली त्यांची शेवटची सभा नाशिकमध्ये झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही समाचार घेतला. शिवाय विरोधी पक्षात असताना सिंचन घोटाळ्याप्रकरणी घसा फोडून ओरडणारं भाजप आता गप्प का आहे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई का नाही? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.

नाशिकमध्ये नरेंद्र मोदींनी येऊन कांदा उत्पादकांना भाव देऊ असं सांगितलं, देवेंद्र फडणवीस दोन वर्षांपूर्वी म्हणाले आम्ही 12 हजार विहिरी बांधल्या. तरीही 28 हजार गावं आज दुष्काळग्रस्त आहेत. नाशिकच्या जवळच्या तालुक्यातील गावात जीवावर बेतून पाणी भरत आहेत. काय झालं त्या विहिरींचं? आधीच्या सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत होते. त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर भाजपचे नेते घसा फोडून ओरडत होते. पण सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले होते ते सुनील तटकरे आणि अजित पवारांवर का नाही कारवाई झाली? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

भाजप-शिवसेनेच्या काळात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं भांडवल करून हे सत्तेत आले आणि याच शेतकऱ्यांविषयी भाजपचे नेते वाट्टेल ती विधानं करतात. यात केंद्रीय कृषीमंत्र्यांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत सगळे आहेत. हा सत्तेचा माज आहे. आज शेती तोट्यात आहे म्हणून शेतकरी कुटुंबातील मुलं, मुली शेती सोडून नोकरीच्या शोधात फिरत आहेत. याच तरुण-तरुणींना मोदींनी 2014 ला सांगितलं की आम्ही दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ. पण पुढे झालं काय? किती नोकऱ्या दिल्या गेल्या?, असं सवाल विचारत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.

VIDEO : राज ठाकरेंचं नाशिकमधील संपूर्ण भाषण

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.