AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तीन ग्रह खेळ बिघडवणार, भारत -पाकिस्तान युद्धाबाबत मोठं भाकीत, काय आहे भविष्यवाणी?

सध्या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे, या सर्व पार्श्वभूमीवर भारत -पाकिस्तान युद्ध होणार का? युद्ध झाल्यास कोणाचं किती नुकसान होणार? हे युद्ध कोण जिंकणार याबाबत मोठी भविष्यवाणी आता समोर आली आहे.

हे तीन ग्रह खेळ बिघडवणार, भारत -पाकिस्तान युद्धाबाबत मोठं भाकीत, काय आहे भविष्यवाणी?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 09, 2025 | 4:00 PM
Share

काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून या हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना मारण्यात आलं, त्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला असून, पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला देखील भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, पाकिस्तानची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे. पाकिस्ताननचे अनेक मिसाईल पाडण्यात आले आहेत.

दरम्यान सध्या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. युद्धजन्य परिस्थिती आहे, या सर्व पार्श्वभूमीवर भारत -पाकिस्तान युद्ध होणार का? युद्ध झाल्यास कोणाचं किती नुकसान होणार? हे युद्ध कोण जिंकणार याबाबत मोठी भविष्यवाणी आता समोर आली आहे. मे महिन्यामधील गोचर हे खूप अनिष्टकारक आहे, मित्राच्या घरामध्ये शत्रू बसला आहे, बुधाच्या घरात शुक्र गोचर करत आहे. हे शुभ मानलं जात नाही. तसेच वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला शुक्रवार येतो, शास्त्रात हे देखील अशुभ मानलं जातं. यामुळे कलह वाढतो अशी मान्यता आहे.

मे महिन्यात कसे असणार ग्रह नक्षत्र?

तब्बल बारा वर्षानंतर गुरु अतिचारी चाल चालणार आहे, गुरु मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. जेव्हा गुरू अतिचारी चाल चालतो तेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. सोबतच 18 मे रोजी राहु कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे शनि देव आणि राहू यांचा पिशाच्च योग बनत आहे, जो ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोणातून अशुभ मानला जातो.

ग्रह नक्षत्राच्या स्थितीवरून असं भाकीत वर्तवण्यात आलं की, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होईल, मात्र ती मोठ्या स्तरावर होणार नाही, आणि जर युद्ध झालंच तर पाकिस्तानचं मोठं नुकसान होईल, कारण शनि, राहू आणि शुक्र हे तीन ग्रह पाकिस्तानचं मोठं नुकसान करणार आहेत. पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता आहे, ज्याचे परिणाम पुढील अनेक वर्ष पाकिस्तानला भोगावे लागतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.