AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 सप्टेंबरपासून कन्या राशीत बुधादित्य योग, तीन राशींवर होणार बुध आणि सूर्याची कृपा

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. त्यामुळे ठरावीक कालावधीनंतर शुभ अशुभ योग तयार होत असतात. असाच एक योग 17 सप्टेंबरला कन्या राशीत तयार होणार आहे. बुध आणि सुर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल. यामुळे तीन राशींचं भलं होणार आहे.

17 सप्टेंबरपासून कन्या राशीत बुधादित्य योग, तीन राशींवर होणार बुध आणि सूर्याची कृपा
17 सप्टेंबरपासून कन्या राशीत बुधादित्य योग, तीन राशींवर होणार बुध आणि सूर्याची कृपाImage Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 14, 2025 | 6:18 PM
Share

गोचर कुंडलीनुसार 17 सप्टेंबरला सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच कन्या संक्रांती होणार आहे. याच राशीत पुढे सूर्यग्रहणाचा योग जुळून येणार आहे. असं असताना सूर्यग्रहणापूर्वी सूर्य आणि बुधाची युती कन्या राशीत होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होतो. सूर्याच्या अगदी जवळ असलेला ग्रह म्हणजेच बुध.. त्यामुळे सूर्य आणि बुधाची अनेकदा युती होत असते ज्योतिषशास्त्रात हा सर्वात शुभ योग मानला जातो. बुध सूर्यापासून 14 अंश मागे असतो तेव्हा या योगाचा सर्वोत्तम परिणाम दिसून येतो. कुंडलीच्या कोणत्याही घरात हा योग तयार झाला तर त्या व्यक्तीला त्या घराशी संबंधित चांगले परिणाम मिळतात. या स्थितीमुळे तीन राशींना लाभ मिळणार आहे. कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेऊयात

वृषभ : बुधादित्य योगामुळे या राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळेल. मनासारखी नोकरी मिळू शकते. नोकदार वर्ग कामकाजात व्यस्त राहील. दुसरीकडे, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. व्यवसायातील उत्पन्न चांगलं राहील. आर्थिकदृष्ट्या खर्चाचे नियोजन व्यवस्थित करा. चांगल्या कालावधीत शुभ घटनांचा ओघ सुरु राहील. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या स्वताहून पूर्णत्वास न्या. तुम्हाला फळ मिळेल असं ग्रहमान आहे.

वृश्चिक : या राशिच्या लाभ स्थानात सूर्य आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे करिअर आणि उद्योग धंद्यात प्रगती दिसून येईल. या कालावधीत शुभ आणि चांगला गोष्टी घडतील. कोणावर अवलंबून राहू नका. आपलं काम आपणच करावं हा सिद्धांत पाळा. दुसऱ्याच्या हाती महत्त्वाचं काम सोपवण्याऐवजी स्वत:च केलं तर फळ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून डोक्यावर असलेली चिंता दूर होईल.

धनु : या राशीच्या कर्मस्थानात सूर्य आणि बुध एकत्र येत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास अडचण येणार नाही. काही कामं तुम्ही ठरवाल त्या पद्धतीने होतील . आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक वेळी आपण बोलू तेच खरं असं होत नाही. व्यवसायातील उलाढाल वाढेल. आर्थिकदृष्ट्या खर्च कमी करा आणि समाजसेवा करताना भान ठेवा. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.