AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyog : चंद्राच्या गोचरामुळे शशि राजयोगाची स्थिती, तीन राशींना मिळणार लाभ

Shashi Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत चंद्र हा सव्वा दोन दिवस ठाण मांडून असतो. चंद्राच्या सध्याच्या स्थितीमुले शशि राजयोग तयार झाला आहे. तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे.

Rajyog : चंद्राच्या गोचरामुळे शशि राजयोगाची स्थिती, तीन राशींना मिळणार लाभ
Rajyog : चंद्राने वृषभ राशीत प्रवेश करताच सव्वा दोन दिवसांसाठी तयार केला शशि राजयोग, तीन राशींना फायदेशीर
| Updated on: Oct 05, 2023 | 4:07 PM
Share

मुंबई : ग्रहांच्या स्थितीमुळे कामाची गणितं बदलत असतात. काही ठिकाणी कामं होतात तर काही जणांना अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रहांच्या प्रभावामुळे असं होत असतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीकडे कायम लक्ष लागून असतं. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत वेगाने गोचर करतो. त्यामुळे मनावर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. दुसरीकडे चंद्र गोचरासोबत त्याच्या कलाही बदलत असतात त्याचाही प्रभाव दिसून येतो. चंद्र जेव्हा वृषभ आणि कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा राजयोग तयार होतो. 4 ऑक्टोबरला चंद्राने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यामुळे शशि राजयोग तयार झाला आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

वृषभ : या राशीतच शशि राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांचा आत्मविश्वास दुणावलेला राहील.काही योजना राबवण्यात यश मिळेल. तसेच तणावातून मुक्ती मिळेल. एखादा निर्णय पथ्यावर पडेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. उद्योगपतींचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तसेच नशिबाची उत्तम साथ मिळेल.

कर्क : या राशीच्या जातकांना शशि राजयोगाचा जबरदस्त फायदा होईल. राजकारण आणि सरकारी नोकरी करत असलेल्या जातकांना सर्वाधिक लाभ मिळेल. मनासारखा जॉब किंवा एखाद्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते. या कालावधीत आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. त्यामुळे निर्णय क्षमता वाढेल. समाजात मानसन्मान वाढेल. आयात निर्यातीच्या व्यवसायात चांगलं यश पदरी पडेल.

वृश्चिक : या राशीच्या जातकांना शशि राजयोग लाभदायी ठरेल. अचानध धनलाभ होऊ शकतो. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत तयार होतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील.प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. आरोग्याच्या तक्रारी या कालावधीत दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा