AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadesati : शनिची साडेसाती कधी संपते? असा असतो शनिच्या साडेसातीचा प्रवास

Shani Sadesati शास्त्रानुसार शनिच्या साडेसातीमध्ये काही उपाय केल्याने जीवनात लाभ होतो आणि काही प्रमाणात त्रासांपासूनही सुटका मिळते. या काळात दान, शनिमंत्राचा जप, महादेवाची पूजा आणि काळे तीळ किंवा उडीद दान केल्याने साडेसातीच्या वेदनापासून मुक्ती मिळते. याशिवाय हनुमान चालिसाचे पठणही तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

Sadesati : शनिची साडेसाती कधी संपते? असा असतो शनिच्या साडेसातीचा प्रवास
शनि शिंगणापूर Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 14, 2024 | 9:19 AM
Share

मुंबई : शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीची खडतर परीक्षाही घेतात. ज्योतिष शास्त्रात त्याला कर्म दाता म्हणण्यामागचे कारण असे आहे की शनि माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.  शनिदोषाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात क्लेशदायक म्हणजे त्यांची साडेसाती (Sadesati Upay) असते. अडिचकी अडीच वर्षे टिकतो. मात्र साडेसातीचा काळ माणसाची परीक्षा घेते आणि त्याला साडेसात वर्षे त्रास तसेच शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. या साडेसातीचे 3 टप्पे आहेत, चला जाणून घेऊया साडेसातीचे तीन टप्पे कोणते आहेत आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणते सोपे उपाय केले पाहिजेत.

शनिच्या साडे सतीचे तीन चरण

उदयावस्था- शनीची साडेसतीची ही पहिली अवस्था आहे, त्याचा प्रभाव अडीच वर्षांपर्यंत दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार या चरणात व्यक्तीच्या डोक्यावर शनिदेव वास करतात आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या काळात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उदयाच्या काळात व्यक्तीची आर्थिक स्थिती बिघडते, शरीराला त्रास होतो, मानसिक ताणतणाव, कुटुंबातील चिंता, कलह इत्यादी गोष्टी या अवस्थेत सहन कराव्या लागतात.

मध्यचरण- हा टप्पा शनि महाराजांच्या साडेसातीचा दुसरा टप्पा आहे, या टप्प्याला मध्य चरण असेही म्हणतात. त्याची मुदत एकूण अडीच वर्षांची आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात शनिदेव व्यक्तीच्या खांद्यावर स्वार होतात. शनीची साडेसतीची ही अवस्था माणसाची कठीण परीक्षा घेते. या काळात माणसाला खूप मेहनत करावी लागते. पण यासोबतच त्याला यशही मिळते. या टप्प्यात व्यक्तीला त्याच्या करिअरमध्ये यश, आर्थिक लाभ आणि सन्मान प्राप्त होतो. माणसाच्या कठोर परिश्रमानंतर साडेसतीचा हा टप्पा त्याला सक्षम बनवतो.

अस्त चरण- हा शनि महाराजांचा शेवटचा आणि तिसरा चरण आहे. इतर दोन टप्प्यांप्रमाणे, हे देखील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी होते. शनिदेवाच्या साडेसातीच्या शेवटचा टप्पा माणसाच्या पायावर परिणाम करतो. या काळात व्यक्तीला थोडा आराम मिळतो. तरीही त्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो. या टप्प्यात माणसाला त्याच्या आयुष्यात संतुलन निर्माण करण्याची गरज असते. या चरणाच्या समाप्तीनंतर, व्यक्ती शनीच्या साडेसातीपासून पूर्णपणे मुक्त होते.

साडेसातीच्या वेळी करावयाचे उपाय

शास्त्रानुसार शनिच्या साडेसातीमध्ये काही उपाय केल्याने जीवनात लाभ होतो आणि काही प्रमाणात त्रासांपासूनही सुटका मिळते. या काळात दान, शनिमंत्राचा जप, महादेवाची पूजा आणि काळे तीळ किंवा उडीद दान केल्याने साडेसातीच्या वेदनापासून मुक्ती मिळते. याशिवाय हनुमान चालिसाचे पठणही तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.