AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्र ग्रहाचं आपल्या प्रिय राशीत महिनाभरासाठी ठाण, तीन राशींच्या लोकांना होणार फायदा

नवग्रहांमध्ये बुधानंतर शुक्र हा हा सूर्याजवळचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. हस्तरेखा शास्त्रात तळहाताच्या अंगठ्याच्या शेजारील उंचवटा शुक्राचा असतो.

शुक्र ग्रहाचं आपल्या प्रिय राशीत महिनाभरासाठी ठाण, तीन राशींच्या लोकांना होणार फायदा
शुक्र ग्रहाचं स्वराशीत गोचरामुळे तीन राशींचं नशिब पालटणार, पैशांची चणचण होणार दूर
| Updated on: Apr 08, 2023 | 12:05 PM
Share

मुंबई – ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा शुभ ग्रह म्हणून गणला जातो. या ग्रहाची साथ असेल तर धन, संपत्ती आणि भौतिक सुख मिळतं. त्यामुळे शुक्राची स्थिती कुंडलीत चांगली असलेल्या जातकांना चांगलं आयुष्य उपभोगायला मिळतं. त्यामुळे शुक्राची कुंडलीतील स्थिती आणि गोचर कालावधीकडे ज्योतिष बारकाईने बघतात. शुक्र ग्रहाने 6 एप्रिल 2023 रोजी आपली स्वरास असलेल्या वृषभ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शुक्र महिनाभर असणार आहे. त्यामुळे 12 राशींवर या गोचराचा परिणाम दिसून येईल. तीन राशींना या गोचराचा फायदा होईल.

वृषभ – या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीत शुक्राने गोचर केलं आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात फरक दिसून येईल. या काळात जोडीदारासोबत एखादा बिझनेस सुरु करू शकता. बाहेरगावी फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.

कर्क – या राशीच्या उत्पन्न भावात शुक्राचं गोचर आहे. त्यामुळे शुक्राची चांगली साथ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असेल. काही करार या काळात निश्चित होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. शेअर बाजार, लॉटरी या माध्यमातून अचानक धनलाभ होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळेल.

तूळ – शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन अष्टम स्थानात होणार आहे. या काळात करिअर आणि नोकरीत चांगलं यश मिळताना दिसेल. नवा बिझनेस सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण या काळात चांगलं राहील. पती पत्नीमध्ये संवाद वाढेल. जे जातक फिल्म लाइन, मीडिया, कला आणि संगीताशी निगडीत आहेत त्यांना शुक्राचं बळ मिळेल. त्याचबरोबर अडकलेली कामं मार्गी लागतील.

कमकुवत शुक्र मजबूत करण्याचे ज्योतिषीय उपाय

  • ज्या जातकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत त्यांनी प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला “ऊं द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः” या मंत्राचा जप करावा.
  • शुक्रवारी मुंग्यांना पीठात साखर मिश्रित करून द्या. त्यामुळे आर्थिक लाभ होईल.
  • शुक्रवारी भगवान शिवांना पांढरं फुल अर्पण करा.
  • शुक्रवारी जेवणात साखर, तांदूळ, दूध, दही आणि तुपाचा वापर करावा.
  • पाण्यात वेलची टाकून स्नान करा. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.