AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला, ‘यांच्या’ सरकारकडून झालेली घोषणा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. Dr.BR Ambedkar Bharat Ratna

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला, 'यांच्या' सरकारकडून झालेली घोषणा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
| Updated on: Mar 31, 2021 | 11:25 AM
Share

मुंबई: भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारनं आजच्याच दिवशी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तो दिवस 31 मार्च 1990 होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतरत्न देण्यात आला. (Dr.BR Ambedkar was conferred Bharat Ratna Posthumously on March 31, 1990 by VP Singh Government )

31 मार्च 1990 ला मरणोत्तर भारतरत्न जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं 31 मार्च 1990 घोषित केलं. 14 एप्रिल 1990 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

संविधान निर्मितीमध्ये महत्वाचं काम

भारतीय स्वांतंत्र्य लढ्याला यश येण्याची चिन्ह दिसत असताना भारतीय संविधान समितीची स्थापना करण्यात आली होती. संविधान समितीवर भारताची राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी होती. संविधान समितीनं त्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली आणि त्याची जबाबदारी डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलं. अखेर 26 नोव्हेंबर 1949 संविधान समितीनं राज्यघटना मंजूर केली.

मानवी हक्कांसाठी लढा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील दलित समाजातील नागरिकांच्या मानवी हक्कांसाठी लढा उभारला. महाड येथील चवदार तळे खुलं करणं असो किंवा नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीचं आंदोलन असो ही दोन्ही आंदोलनं मानवी हक्कांच्या लढ्यातील महत्वाची आंदोलन ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्क अधिकारांसाठी देखील लढा ऊभारला.

संबंधित बातम्या:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 370 ला विरोध का केला होता?

BLOG: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : अष्टपैलू आंबेडकर!

(Dr.BR Ambedkar was conferred Bharat Ratna Posthumously on March 31, 1990 by VP Singh Government )

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.