AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला, ‘यांच्या’ सरकारकडून झालेली घोषणा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. Dr.BR Ambedkar Bharat Ratna

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला, 'यांच्या' सरकारकडून झालेली घोषणा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
| Updated on: Mar 31, 2021 | 11:25 AM
Share

मुंबई: भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारनं आजच्याच दिवशी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तो दिवस 31 मार्च 1990 होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतरत्न देण्यात आला. (Dr.BR Ambedkar was conferred Bharat Ratna Posthumously on March 31, 1990 by VP Singh Government )

31 मार्च 1990 ला मरणोत्तर भारतरत्न जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं 31 मार्च 1990 घोषित केलं. 14 एप्रिल 1990 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

संविधान निर्मितीमध्ये महत्वाचं काम

भारतीय स्वांतंत्र्य लढ्याला यश येण्याची चिन्ह दिसत असताना भारतीय संविधान समितीची स्थापना करण्यात आली होती. संविधान समितीवर भारताची राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी होती. संविधान समितीनं त्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली आणि त्याची जबाबदारी डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतलं. अखेर 26 नोव्हेंबर 1949 संविधान समितीनं राज्यघटना मंजूर केली.

मानवी हक्कांसाठी लढा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील दलित समाजातील नागरिकांच्या मानवी हक्कांसाठी लढा उभारला. महाड येथील चवदार तळे खुलं करणं असो किंवा नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठीचं आंदोलन असो ही दोन्ही आंदोलनं मानवी हक्कांच्या लढ्यातील महत्वाची आंदोलन ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्क अधिकारांसाठी देखील लढा ऊभारला.

संबंधित बातम्या:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 370 ला विरोध का केला होता?

BLOG: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : अष्टपैलू आंबेडकर!

(Dr.BR Ambedkar was conferred Bharat Ratna Posthumously on March 31, 1990 by VP Singh Government )

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.