AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी या चुका अवश्य टाळा, अन्यथा होतील नकारात्मक परिणाम

या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते.

Aashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी या चुका अवश्य टाळा, अन्यथा होतील नकारात्मक परिणाम
आषाढी एकादशीImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 28, 2023 | 8:20 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व मानले जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi 2023) म्हणतात. या दिवशी पंढरपूरात लाखो भावीक दर्शनासाठी येतात. या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा (Devshayani Ekadashi 2023) म्हणतात या दिवसापासून पुढचे चैर महिने भगवान विष्णू योग निद्रेत जाता. या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एकादशीच्या दिवशी काही नियम करण्यात आले

एकादशीच्या दिवशी भाविक भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे.

ब्रह्मचार्याचे पालन करावे

एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्रांचा जप करावा. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे.

तामसिक पदार्थांपासून दूर राहा

देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतीही नशा करू नये. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे काम बिघडू शकते.

एकादशीच्या दिवशी भात वर्ज्य करावा

धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही एकादशीला भाताचे सेवन करू नये. या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची पूजा करावी. पोहे पुलाव इत्यादी भातापासून बनवलेल्या इतर गोष्टी खाणे टाळा. एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे.

वाईट विचार मनात आणू नयेत

देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये, कोणाचाही वाईट विचार करू नये, या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे. भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.