AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या दिशेला रोप लावणे अशुभ मानले जाते? जाणून घ्या ‘हे’ वास्तु नियम

हिरवीगार झाडे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतातच पण सकारात्मक ऊर्जा देखील तुम्हाला मिळत असते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे चुकीच्या दिशेने लावल्याने तुमच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतात? चला तर मग याबद्दल आपण जाणून घेऊयात...

कोणत्या दिशेला रोप लावणे अशुभ मानले जाते? जाणून घ्या 'हे' वास्तु नियम
कोणत्या दिशेला रोप लावणे अशुभ मानले जाते? जाणून घ्या 'हे' वास्तु नियमImage Credit source: TV9 Network/Hindi
| Edited By: | Updated on: Nov 01, 2025 | 10:18 PM
Share

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे घराची उभारताना आपण स्वयंपाकघर, देवघर किंवा बेडरूम हे योग्य दिशेला बांधतो कारण यामुळे आपल्या घरात व घरातील व्यक्तींवर यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम होत असतो, त्याचप्रमाणे घरात ज्या दिशेला रोपं लावली जातात त्या दिशेमुळे जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा देखील संक्रमित होते. जर तुम्ही घरामध्ये चुकीच्या दिशेने एखादं रोप लावलं तर शुभ परिणामांऐवजी त्यांचे अशुभ परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात कोणत्या दिशेने रोपं किंवा झाडं लावणे अशुभ मानले जाते आणि कोणत्या दिशेला शुभ मानली जातात.

वास्तुशास्त्रात झाडांच महत्त्व

घरात रोपं लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. झाडं केवळ आपल्या घरातील वातावरण शुद्ध करत नाहीत तर सकारात्मक ऊर्जा देखील देतात. तुळशी, मनी प्लांट आणि बांबूची छोटी रोपं यासारख्या वनस्पतींना संपत्ती, सौभाग्य आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. मात्र जर ही झाडं चुकीच्या दिशेने घरामध्ये ठेवली तर त्यांचे शुभ परिणाम कमी होतात.

या दिशांना झाडे लावणे मानली जातात अशुभ

दक्षिण दिशा

वास्तुनुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेने रोपं किंवा झाडं लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

विशेषत: निवडुंग, गुलाबाची झाडं किंवा सुकलेली झाडे दक्षिण दिशेला ठेवू नयेत.

पश्चिम दिशा

पश्चिमेला सूर्यास्ताची दिशा असते. या दिशेला रोपं लावल्याने घरात आळस, थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो.

जर तुम्हाला या दिशेने झाडे लावायची असतील तर खूप मर्यादित संख्येने आणि कमी उंचीची झाडे ठेवा.

ईशान्य दिशा

हा कोपरा देव आणि जल तत्वाचे क्षेत्र मानला जातो. तर ईशान्य दिशेला जड वस्तू किंवा मोठी झाडे ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात.

ईशान्य कोपऱ्यात मोठी झाडे, रोपं किंवा कुंड्या ठेवल्याने घरात शांती आणि आनंदात बाधा येते आणि आर्थिक प्रगती थांबते.

या दिशांना झाड व रोपं लावणे शुभ आहे

उत्तर दिशा

उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजेच धनाची देवता यांची दिशा मानली जाते. येथे मनी प्लांट, तुळस, फर्न किंवा इतर हिरवीगार झाडे लावल्याने संपत्ती आणि सौभाग्य वाढते.

पूर्व दिशा

ही दिशा सूर्याच्या उर्जेने भरलेली आहे. या दिशेला रोपं लावल्याने घरात ताजेपणा, आरोग्य आणि समृद्धी येते.

सकाळचा सूर्यप्रकाश रोपांना व झाडांना ताजेतवाने आणि हिरवेगार ठेवतो आणि ही दिशा मानसिक शांतीसाठी देखील चांगली मानली जाते.

ईशान्येला फक्त लहान रोपं ठेवा

तुळशीचे रोप पवित्र मानले जाते आणि ते पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

काटेरी झाडे आणि सुकलेली झाडे

निवडुंग, बाभूळ किंवा इतर कोणतेही काटेरी रोपं घरात ठेवू नये. यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव आणि मानसिक अशांतता येते.

घरामध्ये सुकलेल्या किंवा कोमेजलेल्या वनस्पती ठेवणे देखील अशुभ मानल्या जातात. ते नकारात्मकता पसरवतात म्हणून अशी रोपं व झाडं ताबडतोब काढून टाकावेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.