AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात यश मिळवायचं असेल तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा, आचार्य चाणक्य काय सांगतात…

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे अर्थशास्त्र आणि मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने कुशल मनुष्य होते. चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या आहेत

Chanakya Niti | आयुष्यात यश मिळवायचं असेल तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा, आचार्य चाणक्य काय सांगतात...
आयुष्यातील या 4 कारणांमुळे व्यक्तीला व्हावे लागते अपमानित
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 7:14 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे अर्थशास्त्र आणि मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने कुशल मनुष्य होते. चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचे वचन लोकांमध्ये अजूनही लोकप्रिय आहेत, आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्यास ते प्रेरित होतात. तुम्हालाही आयुष्यात पुढे जायचे असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही चाणक्य नीतिचे अनुसरण करु शकता (Acharya Chanakya Said If ou Want To Get Success In Life Do These Things By Chanakya Niti).

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही काम करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तरच ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते. कोणतेही कार्य करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते जाणून घ्या –

नवीन काम करण्यापूर्वी योजना तयार करा

आचार्य चाणक्य म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी व्यक्तीने योजना बनविली पाहिजे. आपण कोणतेही कार्य नियोजन न करता केल्यास त्या कामात अनेक अडथळे येऊ शकतात. व्यक्ती काम करण्यापूर्वी एखादी योजना बनवित असेल तर ते काम चांगल्या पद्धतीने करण्यास ती सक्षम असते.

परिश्रम करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, यशाची पहिली पायरी म्हणजे कठोर परिश्रम. जर तुम्ही परिश्रम घेऊन कोणतेही काम केले तर नक्की यश मिळेल. ते म्हणतात की कोणतेही काम करण्यासाठी केलेली मेहनत कधीच व्यर्थ ठरत नाही, म्हणून नेहमी परिश्रम घेतले पाहिजे.

काम पूर्ण होण्यापूर्वी योजना जाहीर करु नये

चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार कोणतेही काम करण्यापूर्वी एखाद्याने त्यासंबंधित योजनेविषयी कुणाला सांगू नये. यामुळे कार्य यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. चाणक्य म्हणतात की जर तुम्ही तुमची योजना आधीच उघड केली तर तुम्हाला जळणारे लोक ती नाकारण्याचा प्रयत्न करतील. म्हणून, आपले कार्य पूर्ण होईपर्यंत योजनेचा उल्लेख करु नका.

Acharya Chanakya Said If ou Want To Get Success In Life Do These Things By Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti: एखादा व्यक्ती लोकांचा आवडता लीडर कसा होतो? चाणक्य म्हणतात हे 4 गुण महत्वाचे!

लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.