AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ‘या’ चार संकटात फसला असाल तर पळ काढण्यातच शहाणपण

मुंबई : कधी कधी परिस्थिती अशी असते की त्यातून मार्ग काढणं हाच पर्याय असतो. आचार्य चाणक्यनेही अशा चार स्थितींचा उल्लेख ग्रंथ ‘चाणक्यनिती‘मध्ये केलेला आहे. (Acharya Chanakya Said never face these four conditions or you-can lost your life Chanakya Niti). सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की, परिस्थिती, वेळ कशीही असो तुम्ही तिचा सामना करा. पण कधी कधी […]

Chanakya Niti : 'या' चार संकटात फसला असाल तर पळ काढण्यातच शहाणपण
Chanakya Niti
| Updated on: May 30, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई : कधी कधी परिस्थिती अशी असते की त्यातून मार्ग काढणं हाच पर्याय असतो. आचार्य चाणक्यनेही अशा चार स्थितींचा उल्लेख ग्रंथ ‘चाणक्यनिती‘मध्ये केलेला आहे. (Acharya Chanakya Said never face these four conditions or you-can lost your life Chanakya Niti).

सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की, परिस्थिती, वेळ कशीही असो तुम्ही तिचा सामना करा. पण कधी कधी वेळ अशी असते की त्यात आपण फसलोत तर त्यातून मार्ग काढणं गरजेचं असतं. आपण त्या परिस्थितीशी लढायचं ठरवलं तर काही वेळेस ते आपल्या जीवावर बेतू शकतं आणि मान-सन्मानही संकटात येऊ शकतो. पण सर्वच संकटांचा सामना केला पाहिजे का? आचार्य चाणक्य म्हणतात, नाही, अशा चार परिस्थिती, संकटं आहेत, ज्यातून पळ काढण्यातच शहाणपण आहे. त्या चार परिस्थिती कुठल्या?

उपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे असाधुजनसंपर्के यः पलायति स जीवति

1.ह्या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य म्हणतात की, जर कुठे हिंसा उसळली असेल आणि जमाव हल्ला करत असेल तर तिथून पळ काढण्यातच शहाणपण आहे. कारण जमावाला तुम्ही नियंत्रीत करु शकत नाही आणि त्या टोळक्याला हिंसेशिवाय काही दिसत नसतं.

2. जर अचानक तुमच्या शत्रूनं हल्ला केला तर तिथून सुरक्षित निघून जाणच गरजेचं आहे. कारण तुमची कितीही इच्छा असली तरीसुद्धा विना तयारी तुम्ही त्याचा सामना करु शकत नाही. अशा अचानक आलेल्या संकटात तुम्ही बहादुरी दाखवायला गेलात तर जीवानीशी जाऊ शकता. यापेक्षा यातून पळ काढलेला बरा.

3. ज्या ठिकाणी दुष्काळ पडलेला असतो, जिथं लोक अन्नाच्या कणाकणाला तरसत असतील असं ठिकाण सोडणच कधीही चांगलं. कारण अशा दुष्काळी जागी तुम्ही फार काळ जीवंत राहू शकत नाही.

4. जर असा एखादी व्यक्ती जो गुन्हेगार असेल, अपराधी असेल आणि तो तुमच्या जवळ येऊन उभा राहिला असेल तर तिथून निघून जाणं कधीही चांगलं. अशा लोकांसोबत उभं राहिल्यानं तुमची प्रतिमा डागाळू शकते. मान-सन्मान धोक्यात येऊ शकतो.

(Acharya Chanakya Said never face these four conditions or you-can lost your life Chanakya Niti).

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात…

Garuda Purana : या तीन गोष्टी नेहमी मूळापासून नष्ट करायला हव्या, अन्यथा तुमच्या जीवाला धोका उद्भवू शकतो

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...